Breaking News

कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षेसाठी एसओपी, औरंगाबाद येथील घटनेनंतर सरकारचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

औरंगाबाद शहरातल्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर माहिती देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ही घटना दुर्दैवी असून सरकारने त्याची गांभीयार्ने दखल घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिका-यांमार्फत करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे.

त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या कोविड सेंटरवर रोजच्या रोज महिलांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांना आपण चार वेळा पत्रे लिहून कोविड सेंटरसाठी एसओपी तयार करावी, अशी विनंती केली. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. ही एसओपी तातडीने लागू करावी, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर अजित पवार यांनी या महिनाअखेरपर्यंत एसओपी तयार करण्याचे आश्वासन दिले.

About Vishwbharat

Check Also

कांद्या सडला : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कांद्याचे कोठार समजला जातो. पण, हे कोठार आता अवकाळी पावसाने …

वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार : परिसरात दहशत

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल)च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार झाल्या. मेंढा (माल) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *