विश्व भारत ऑनलाईन :
पीडब्लूडीमध्ये काही उपविभागीय अभियंत्यांना पदोन्नती मिळाली. मात्र, पदोन्नती मिळाली त्याच ठिकाणी बदली व्हावी, यासाठी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. त्यामुळे हा घोळ वाढत असून पीडब्लूडीतील काही अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे समोर आले आहे. 4-5 महिने पदोन्नतीला होऊनही रुजू होण्यास काही अभियंते अनुत्सुक असल्याचे कळते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकडे लक्ष देणार काय, असा प्रश्न आहे.
बदल्यांचे प्रकरण काय?
पीडब्लूडीतील कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांचा बदल्या लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र, दिवाळी असल्याने बदल्यांना ब्रेक लागणार काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.जे अधिकारी अनेक वर्षापासून गड़चिरोली,औरंगाबाद,रत्नागिरी या भागात कार्यरत असून त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आहे.