Breaking News

वाळू तस्करी : तर तलाठी,मंडळ अधिकारी, तहसीलदार निलंबित

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
राज्यातील बऱ्याच भागात वाळूचोरी मोठ्या प्रमाणावर होत असते. लिलाव बंद असताना नियमबाह्य वाळूची चोरी होत आहे.

Advertisements

हा प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे सुतोवाच मंत्री विखे-पाटील यांनी केले. ज्या भागातून वाळू चोरी केली जाते,त्या भागातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सध्या राज्यातील सर्वच जिल्ह्यात वाळू माफियांनी थैमान घातले आहे. यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे.

Advertisements

वाळूचोरीमुळे शासनाचा महसूल बुडत आहे. त्यामुळे राज्यात सर्वच जिल्ह्यांत होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी लवकरच राज्य सरकार वाळूविषयी नवे धोरण राबवणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या वेळी पंढरपूर येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील अधिकारी गेले लंडनला : शासकीय पैशाचा अपव्यय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आपल्या विविध उपक्रमांनी कायमच चर्चेत असते. …

1 रुपयांचेच वेतन घेतो IAS अधिकारी : वाचा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? अशा प्रश्नांची उत्तरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *