Breaking News

भूसंपादन न करता तयार झाला रस्ता, शेतकऱ्यांची ओरड…. वाचा

 

विश्व भारत ऑनलाईन :
शेताच्या बाजूने रस्ता तयार करायचा असल्यास भूसंपादन प्रक्रिया केली जाते. मात्र, किरकोळ भूसंपादन करून रस्ता तयार केल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे.

सातारा जिल्ह्याला वेगवान करण्यासाठी अनेक राष्ट्रीय महामार्ग झाले. पुणे- बेंगलोर या 4 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला तर आशियाई महामार्ग 47 म्हणून मान्यता देखील मिळाली. आता सातारा- लातूर हा महामार्ग रस्ते विकास महामंडळाने गेल्या तीन वर्षात तयार केला आहे. सातारा, कोरेगाव, खटाव व माण या तालुक्यातून हा रस्ता जातो. मात्र, अनेक ठिकाणी भूसंपादन न करताच हा रस्ता करण्यात आला. त्यामुळे भूसंपादन कधी होणार, त्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल शेतकरी करीत आहेत.

किरकोळ गटाचे भूसंपादन

रस्त्यासाठी अत्यल्प भूसंपादन करावे लागले असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. काही किरकोळ गटाचे भूसंपादन करून शेतकरी वर्गाला याची कल्पना ही देण्यात आली नाही. काही लोकांनी आवाज उठवला असता. दुसऱ्या वेळी निवेदा काढून भूसंपादन करण्यात आले, तर काही ठिकाणी नागरिकांना या वरती कोर्टात धाव घेतली असल्याचे शेतकरी सांगतात.

सगळं होत असताना सर्वसामान्य लोकांना याची पुसटशी ही कल्पना देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. संबंधित ठेकेदार यांनी दंडिलशाहीने रस्ता करून घेतला. यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. याकडे शासन लक्ष देणार का, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

About विश्व भारत

Check Also

शिंदे-फडणवीस-पवार सरकारला निवडणूक आयोगाचा दणका

महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळांवर केलेल्या नियुक्त्या आणि घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीस निवडणूक आयोगाने …

पूर्व CM कमलनाथ व पूर्व MP नकुलनाथ की युवाओं के लिये सार्थक पहल

पूर्व CM कमलनाथ व पूर्व MP नकुलनाथ की युवाओं के लिये सार्थक पहल टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *