Breaking News

महाराष्ट्राच्या राज्यपालांना पदावरून हटवा : मुंबई हायकोर्टात याचिका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपालांवर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे.

त्यातच आता महाराष्ट्रच्या राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा, राज्यपालांनी अवमान केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

कोणी केली याचिका?

याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या वतीने वकील नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने CRPIL/19909/2022 या क्रमांकानं याचिका दाखल करून घेतली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

About विश्व भारत

Check Also

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

उद्धव ठाकरे और जयंत पाटिल को झटका!2 नेता BJP में शामिल

उद्धव ठाकरे और जयंत पाटिल को झटका!2 नेता BJP में शामिल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *