Breaking News

नागपुरात सकाळपासून अवकाळी पाऊस : निम्म्या महाराष्ट्राला फटका

अवकाळी पाऊस, गारपिटीचा नागपूरसह अर्ध्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना फटका बसला आहे. राज्यात हजारो हेक्टरवरील पिके, फळबागा मातीमोल झाल्या आहेत. 16 जिल्ह्यांत नुकसानीचे मोठे आकडे समोर येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. आज मंगळवार सकाळपासून नागपुरात पावसाला सुरुवात झाली.

काही भागांत झालेल्या गारपिटीने फळबागांचेही नुकसान झाले आहे. राज्यात सध्या खरीप हंगामातील भातपिकाची काढणी सुरू आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये प्रामुख्याने काढणीच्या अवस्थेतील भातपिकास फटका बसला आहे.

खरीप ज्वारीच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. याबरोबरच कांदा, कापूस या पिकांनाही फटका बसला आहे. गारपिटीमुळे द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. केळी, मोसंबी, लिंबू आदी फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

About विश्व भारत

Check Also

विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला : नागपुरात पावसाचा जोर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये …

BJP आमदार परिणय फुके यांच्यासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

भाजपचे विधानपरिषद आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *