चौकशीच्या आदेशासाठी ७ दिवस उपोषण, आता चौकशी सुरू करण्यासाठी कीती दिवस बसू ? “सांगा”
(भीम आर्मीचे मदन बोरकर यांचा प्रश्न.)
कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:–
गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी,दोषी आढळल्यास अधिकारी,कर्मचार्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा या मागणीला घेऊन “भीम आर्मी” जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात सलग ७ दिवस गडचांदूर नगरपरिषदपुढे अन्नत्याग उपोषण केले होते.या कालावधीत अनेक घडामोडी घडल्यानंतर अखेर सातव्या दिवशी शासनाला जाग आली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश पत्र दिले.यात उपविभागिय अधिकारी राजूरा यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
मात्र या आदेशाला जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटत असून अद्यापही याविषयी काहिच घडताना दिसत नसल्याचे लक्षात घेऊन “घनकचरा व्यवस्थापन घोटाळा चौकशीच्या आदेश पत्रासाठी ७ दिवस उपोषण केले,आता सांगा चौकशी सुरु करायला किती दिवस बसू” असा प्रश्न बोरकर यांनी उपस्थित करत यासंबंधी येत्या दोन दिवसात भीम आर्मीच्या वरिष्ठांना घेऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आणि यानंतर पुढची रणनीती ठरवणार अशी माहिती मदन बोरकर यांनी दिली आहे.