Breaking News

रोजगार

मंत्रालयातील कर्मचाऱ्याने केली बोगस नोकर भरती

मुंबई मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याकडून लिपिकपदी नोकरी देण्याच्या आमिषाने प्रत्येकी ०६ ते १० लाख रुपये घेऊन फसवणूक सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोगस नोकर भरती रॅकेटच्या आमिषाला बळी पडलेले १० पीडित समोर आले आहेत. प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात महेंद्र सकपाळ, महादेव शिरवाळे, सचिन डोळस व नितीन कुंडलिक या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मालाडमधील रहिवासी सागर जाधव …

Read More »

वन विभागातील परीक्षा ऑनलाईनच, 15 जानेवारीपर्यंत जाहिरात

वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. वन विभागातील पदभरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान …

Read More »

नागपूर जिल्हा परिषदेचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ : संगणक टायपिंगच्या निकाल वाटपात विलंब!

✍️विश्व भारत विशेष नागपूर जिल्हा परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. आता संगणक टायपिंग (GCC-TBC) प्रमाणपत्राचे निकाल वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. मात्र, नागपूरच्या शिक्षण उपसंचालकांना दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी निकालाच्या कागदपत्रांची फाईल वाटप करण्यासाठी नागपूरच्या माध्यमिक विभागाकडे जमा करण्यात आली होती. पण, आजपर्यंत फाईल वाणिज्य टायपिंग इन्स्टिटयूटकडे वाटप करण्यात आली नसून नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने इतका विलंब …

Read More »

हायकोर्टाने रोखली पोलीसभरतीची लेखी परीक्षा : तृतीयपंथीयांचा मुद्दा

पोलीस भरतीच्या अर्जात तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय ठेवणे कठीण असल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. त्यानंतर राज्य सरकारने अखेर उच्च न्यायालयासमोर शुक्रवारी लोटांगण घातले. पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देऊ, त्यांच्या शारीरिक चाचणीसाठी फेब्रुवारीपर्यंत नियमावली बनवू अशी हमी राज्य सरकारने न्यायालयात दिली. त्यावर आता सुधारित नियमावली बनवा आणि नियमावली बनवली जाईपर्यंत पोलीस भरतीची लेखी परीक्षा घेऊ नका, असे सक्त निर्देश …

Read More »

मोदी रविवारी नागपुरात : मेट्रो स्टेशन चकाचक, 240 कॅमेऱ्यांची नजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण होणार आहे. तसेच नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजनही होणार आहे. यावेळी नागपूर रेल्वेस्थानकावर २४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. नागपूर मेट्रोने मोदी प्रवास करतील. त्यासाठी स्थानकावर स्वच्छता ठेवली जात आहे.सोबतच पोलीस विभागानेही चोख नियोजन केले असून शेकडो पोलिसांची बहुस्तरीय सुरक्षा मोदींना पुरवली जाणार आहे. पंतप्रधान ११ डिसेंबरला …

Read More »

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उद्या नागपुरात : समृद्धी महामार्गाची करणार पाहणी

पंतप्रधानांचा दौरा लक्षात घेता उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ते शिर्डी पर्यंत महामार्गाची पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने काही अर्धवट कामे मार्गी लागण्याची, त्रुटी दूर होण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी नागपूरला आगमन होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स येथून …

Read More »

राज्यात 4,122 तलाठ्यांची भरती होणार : एप्रिल-मे मध्ये नियुक्ती

राज्यातील तलाठी पदाच्या चार हजार 122 पदांची भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त एक हजार 12 आणि नव्याने निर्माण केलेल्या तीन हजार 110 या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी …

Read More »

पोलीस भरतीसाठी सराव करताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू

वसईत पोलीस भरतीसाठी सराव करताना एका 22 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रतीक महेंद्र मेहेर असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळ विरारच्या अर्नाळा परिसरात राहणारा आहे. पोलीस भरतीचा सराव करताना प्रतीकला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला मृत्यूने कवटाळलं. वसई पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पोलीस शिपाई भरती होणार आहे. …

Read More »

नागपुरात मिहानमध्ये टाटा करणार गुंतवणूक : गडकरी, फडणवीस प्रयत्नशील

राज्यातील गुंतवणूक बाहेर जात असल्याच्या आरोप सध्या होत आहे. या सध्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाने नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. तसेच विदर्भात उद्योग प्रकल्प यावेत, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्नशील आहेत. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन यांना पत्र पाठवून नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणुकीची …

Read More »

प्रकल्प बाहेर जाण्यास ठाकरेच जबाबदार : टक्केवारीमुळे उद्योजक होते नाराज

उद्धव ठाकरेंच्या काळातच महाराष्ट्रातून उद्योग प्रकल्प बाहेर राज्यात गेले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ही प्रक्रिया सुरु झाली नसून ठाकरेंनाच उद्योग राज्यात ठेवण्यास उत्सुकता नव्हती, असा आरोप भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांनी केलाय. टक्केवारी मागीतल्यानेच उद्योग बाहेर गेले, असा आरोप ठाकरेंवर केला जातोय. आता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे 297 एकरवर होऊ घातलेला रांजणगावचा क्लस्टर म्हणजे महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक इको-सिस्टीमच्या विस्ताराची सुरुवात आहे, असे उद्गार …

Read More »