तलाठी भरतीच्या नावाखाली राज्यात बेरोजगार तरुणांची फसवणूक होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भरतीच्या नावाखालील हजार-हजार रुपये जमा केले जात आहेत. हे पैसे कोणाच्या खात्यात जातात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात शासनाला निट परीक्षाही घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यभरातील तलाठी भरती परीक्षेंच्या केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर विधान …
Read More »तलाठी ऑनलाईन परीक्षेची होणार चौकशी : परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे ढिसाळ नियोजन
तलाठी पदासाठीच्या ऑनलाइन परीक्षेचे ‘सर्व्हर’ सकाळी बंद पडल्यामुळे राज्यभर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या प्रकाराची दखल आमदार बच्चू कडू यांनी घेतली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे बच्चू कडूंनी सांगितले. अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना आमदार कडू म्हणाले, या परीक्षा प्रामाणिकपणे घेतल्या गेल्या पाहिजे. त्यामध्ये जर कुणी बेईमानी करत असेल, तर त्याच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. कारवाई करण्यासाठी सरकारने जरी मागेपुढे पाहिले. तर …
Read More »आरोग्य विभागात 12 हजार पदांची जाहिरात प्रसिद्ध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काही तासांमध्ये झालेल्या रुग्ण मृत्यूच्या प्रकरणानंतर आता राज्यशासन सतर्क झाल्याचे बोलले जात आहे. येत्या आठवडाभरातच आरोग्य विभागाकडून मोठी नोकरभरती होणार आहे. त्याला देखील वेग आला आहे. जवळपास 12 हजार जागांसाठी नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी झालेली भरती वादग्रस्त ठरली होती. त्यात उमेदवारांनी भरलेले शुल्क मिळणार की …
Read More »पोलीस भरतीसाठी बोगस प्रमाणपत्र : पोलीस भरती घोटाळा
राज्यात पोलीस भरतीत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भूकंपग्रस्तांचं बोगस प्रमाणपत्र बनवून पोलिसाची नोकरी मिळवण्याचे प्रकार घडले. अशाच एका रॅकेटचा पुण्यात भांडाफोड झाला आहे. शिवाजीनगर मुख्यालयात कार्यरत असलेला पोलिस शिपाई गोविंद इंगळेचं प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचं एक रॅकेट परभणीत नुकतंच उघडकीस आलं. त्याच्या चौकशीत पुण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची …
Read More »नागपूरमध्येही फुटला तलाठी पेपर : आयएएस अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
राज्यात तलाठी भरतीच्या परीक्षेला 17 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिक आणि नागपूर जिह्यांत पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, हा प्रकार परीक्षा केंद्रांच्या बाहेर घडला आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. परीक्षा घेणार्या टीसीएस कंपनीनेदेखील ऑनलाइन सुरक्षिततेबाबत काटेकोर नियोजन केले असल्याचे स्प्पष्ट केले आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा सुनियोजित वेळेत टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. …
Read More »वनविभागाच्या भरतीत पुन्हा घोटाळा : राज्यातील भरती रद्द करण्याची मागणी
वन विभागातील पदभरती चांगलीच चर्चेत आहे. आता शिपाई पदासाठी ऑनलाईन परीक्षेवेळी अंतर्वस्त्रामध्ये कम्युनिकेशन डिव्हाईस व मायक्रोफोन ठेवून नक्कल करण्याचा हायटेक प्रकार तपासणी पथकाच्या तपासणीत बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी परीक्षार्थीसह चौघाविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीतील वसंतदादा पाटील इन्स्ट्यिूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात वन विभागाच्या कर्मचारी भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा केंद्र आहे. बुधवारी दुपारी परीक्षेपुर्वी आयोजक कंपनीकडून परीक्षार्थींची …
Read More »तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर : १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा, पण…!
राज्याच्या जमाबंदी आयुक्त अंतर्गत येणाऱ्या भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र!नोकऱ्यांचे खासगीकरण
नोकऱ्यांचे होणारे खाजगीकरण आणि त्यातून तयार होणारी निराशा प्रचंड धक्कादायक असते. त्यामुळे नोकऱ्यांचे खासगीकरण मागे घेण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. खाजगी कंपन्यांमार्फत कंत्राटी कर्मचारी नेमण्याचा शासन निर्णय राज्य सरकारकडून मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शासन निर्णय रद्द करण्याची विनंती केली आहे. खाजगी कंपन्यांना विविध पदांसाठी निश्चित वेतनाच्या दरांमध्ये …
Read More »तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी जागा वाढणार?
तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत एक दिवसाने वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची सोमवारी (दि. १७) संपलेली मुदत मंगळवारी (दि. १८) रात्री उशिरापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे तलाठी भरतीसाठी अर्ज दाखल करू न शकलेल्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वनविभागाने राज्यात तलाठ्यांच्या 4644 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून भरती करण्याचा निर्णय घेतला आहे .त्यासाठी 26 जून …
Read More »तलाठी भरतीसाठी दलाल झाले सक्रिय? प्रश्न पारदर्शकतेचा
उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असलेली उपकरणे वापरून पेपर फोडणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी केला आहे. अनेक गावे गैरप्रकारात सहभागी असल्याचे याआधी समोर आले आहे. सूक्ष्म आकाराचा कॅमेरा, प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र परीक्षा केंद्राबाहेर पाठवणे, बाहेरून ‘मायक्रो ब्लूटूथ’द्वारे उत्तरे मागवण्याचे प्रकार याआधी समोर आले आहेत. वादग्रस्त भरती? तलाठी भरती-२०१९, आरोग्य पदभरती-२०२२, म्हाडा भरती, पिंपरी चिंचवड पोलीस भरती-२०२२, मुंबई पोलीस भरती-२०२३ …
Read More »
विश्वभारत News Website