भारतीय नागरिक आठवड्यातून सरासरी 8.36 तास मोबाईल गेम खेळण्यात घालवतात. 60 टक्के गेमर्स एका वेळी सतत 3 तास गेम खेळतात, असा अहवाल इंडिया मोबाइल ऑफ गेमिंग या संस्थेने दिलाय.
महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
मोबाईल गेमच्या व्यसनात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, राजस्थान दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. बिहार चौथ्या आणि पश्चिम बंगाल पाचव्या क्रमांकावर आहे.
2020 मध्ये केलेल्या आणखी एका अहवालात असे दिसून आले आहे की 65 टक्के मुले ऑनलाइन गेमिंगसाठी जेवण आणि झोप सोडण्यास तयार असतात.
मानसशास्त्रज्ञांच्या मते, लोक सहसा वेळ घालवण्यासाठी गेम खेळू लागतात. मात्र याचे केव्हा व्यसनात रुपांतर होते आणि जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनते, हे खेळणाऱ्यांना कळत नाही.