ही पाच शहरे रडारवर
नक्षलवाद्यांनी राज्यातील पाच प्रमुख शहरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, गोंदिया ही शहरे नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरी नक्षल चळवळीवर पोलिसांचा वॅाच असणार असल्याचे महाराष्ट्राच्या नक्षल विरोधी अभियानाचे ‘आयजी’ संदीप पाटील यांनी सांगितले. समाजात असंतोष निर्माण करण्याचा आणि हिंसक आंदोलनाचा शहरी नक्षलवाद्यांचा प्रयत्न आहे. यामुळे शहरी नक्षलवाद्यांना समर्थक करणाऱ्या ५४ संघटना पोलीसांच्या रडारवर आहेत. त्यांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्यात येणार आहे.