Breaking News

औरंगाबाद

सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अजिठा, अनाड गावासह परिसरात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा, पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. काढणीला आलेला गहू अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे पूर्णतः जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून …

Read More »

तरुणाच्या फुप्फुसात अडकली सुई आणि…

जालना जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना आहे. शेतकरी कुटुंबातील ३३ वर्षीय तरुणाच्या फुप्फुसात चार वर्षांपासून अडकलेली सुई शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात डॉक्टरांना अखेर यश आले. शहरातील एका खासगी रुग्णालयात एक तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे तरुणाला जीवदान मिळाले. जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील हा तरुण असून चार वर्षांपूर्वी त्याने शिलाई मशिनची सुई तोंडात धरली असताना अचानक खोकला आला. त्यामुळे तोंडातील सुई थेट गिळली …

Read More »

नागपुरात 77, औरंगाबादमध्ये 75 विकास सोसायट्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत 11 जिल्ह्यातील 798 विकास संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. शासनाच्या मागणीनुसार राज्य सहकारी बँकेने विकास संस्थांच्या सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून सुमारे 3 कोटी रुपयांइतकी रक्कम संबंधित विकास संस्थांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. सहकारातील त्रिस्तरीय रचनेत राज्य सहकारी बँक ही शिखर संस्थेची भूमिका बजावत आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी संस्थांचा समावेश होतो. कोणत्या …

Read More »

नेत्याच्या मुलाच्या लग्नात 900 जणांना विषबाधा

औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात अंदाजे 900 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 900 जणांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांनी औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेरचा लग्नसोहळा बुधवारी 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी …

Read More »

‘जलसंपदा’चे अभियंता गोडसे यांना निलंबित करा : कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण

औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेस. या कामासाठी निविदा काढल्या मात्र वृक्षारोपण कागदावर दाखवून मलाई खाण्यात आली. इतकेच नाही तर एकाच खड्यात दोन झाडे लावण्याचा पराक्रमही गोडसे …

Read More »

पंकजा मुंडेंना मोठा धक्का ; नड्डांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही

2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाले. जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. नुकत्याच बीड येथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे …

Read More »

क्रीडा स्पर्धेच्या नावावर तलाठी गायब : औरंगाबाद ‘महसूल’च्या कारभारामुळे जनता त्रस्त

✍️मोहन कारेमोरे महसूल आणि जनसामान्यांचे नाते आणखी घट्ट विणण्यासाठी राज्य सरकार अतोनात प्रयत्न करते. सामान्य नागरिकांची कामे लवकर व्हावीत, यासाठी तलाठी ते तहसीलदार आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती दिसून येते. औरंगाबाद जिल्ह्यात महसूल विभागातर्फे क्रीडा स्पर्धा आहेत. यात औरंगाबाद, पैठण,कन्नड, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर या तहसील मधील बरेच कर्मचारी सहभागी होतात. पण, काही तालुक्यातील तलाठी मागील 8-10 …

Read More »

शिंदे सरकारला पडला विसर : बुद्धिस्ट पर्यटन सर्किटमध्ये वेरूळ, अजिंठा लेण्यांचा समावेशच नाही

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित स्थळे व बुद्धिस्ट स्थळांचा समावेश असलेल्या पर्यटन सर्किटचा शुभारंभ शनिवारी झाला. मात्र औरंगाबाद शहरातील बौद्ध लेणी व जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त असलेले वेरूळ, अजिंठा येथील बौद्ध लेण्यांचा या सर्किटमध्ये समावेश करण्याचा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना विसर पडला आहे. तर नागपुरातील दीक्षाभूमीचा यात समावेश करण्यात आलाय. औरंगाबादेतील मिलिंद कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा …

Read More »

कर्मचाऱ्यांसह एसडीएम, तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांविरोधात एकवटले, आजचे बंड रद्द

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सतत अपमान करून कामाचा तगादा लावतात, यासह अनेक तक्रारींचा पाढा महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे वाचला होता. यात जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदारही एकवटले होते. मात्र, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मध्यस्थी करून आज जिल्हाधिकारी यांच्याविरोधात होणारे आंदोलन मागे घेण्यास महत्वाची भूमिका बजावली. बंडाचे कारण? …

Read More »

भगर खाताय… सावधान! 156 जणांना विषबाधा.. कुठे आला प्रकार उघडकीस… वाचा

  विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर, कन्नड व बीडच्या गेवराई तालुक्यात भगर खाल्ल्याने १५६ जणांना विषबाधा झाली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. वैजापूर तालुक्यात विषबाधा झालेल्यांची संख्या ११८, कन्नडमध्ये १२ तर गेवराई तालुक्यातील २६ जणांवर उपचार सुरू आहेत. वैजापुरात सोमवारी (२६ सप्टेंबर) रात्री ९ ते मंगळवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या गावातून बाधित रुग्णांच्या संख्येत सकाळपर्यंत वाढ झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये महिलांची …

Read More »