Breaking News

कर्मचाऱ्यांसह एसडीएम, तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांविरोधात एकवटले, आजचे बंड रद्द

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सतत अपमान करून कामाचा तगादा लावतात, यासह अनेक तक्रारींचा पाढा महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे वाचला होता. यात जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदारही एकवटले होते. मात्र, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मध्यस्थी करून आज जिल्हाधिकारी यांच्याविरोधात होणारे आंदोलन मागे घेण्यास महत्वाची भूमिका बजावली.

Advertisements

बंडाचे कारण?

Advertisements

कोणतेही काम असल्यास जिल्हाधिकारी चव्हाण काम झालेच पाहिजे, असा तगादा लावतात. कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे कामे वेळेवर कशी होणार, असा प्रश्न आहे. तसेच पाच दिवस कर्तव्य बजावूनही शनिवार, रविवार कामाचा व्याप वाढत आहे. सुट्ट्या तर बोलूच नका, सतत अपमान केला जातो,विनाकारण नोटीस बजावणे आणि इतर बाबीवरून कर्मचाऱ्यांची मानसिकता खचली आहे. त्यामुळे सोमवार, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी बंड करण्यात येणार होते. मात्र, तूर्तास तरी बंड थंड झाले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘पीडब्लूडी’चे संजय उपाध्ये, प्रशांत वसुले यांचा पुरस्काराने गौरव : मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अभियंत्यांना राज्य शासनातर्फे पुरस्कार घोषित करण्यात आला. …

‘पीडब्लूडी’चे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांना वैयक्तिक पुरस्कार घोषित

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अभियंत्यांना राज्य शासनातर्फे पुरस्कार घोषित करण्यात आला.याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *