Breaking News

मुंबई

 चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठवली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

“याचे दूरगामी परिणाम होतील,” चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याच्या निर्णयावर फडणवीसांची टीका आजच्या कॅबिनेट बैठकीत दारुबंदी हटवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून …

Read More »

शील,समाधी आणि प्रज्ञा म्हणजे काय?.

शील,समाधी आणि प्रज्ञा म्हणजे काय?. प्रज्ञा शील करुणा असे बहुसंख्य महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौद्ध म्हणतात.पण त्याचा अर्थ माहिती असून ही आचरणात आणत नाही.आचरणात शील नसेल तर समाधी कशी लागेल.आणि समाधी लागलीच नाही तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान कसे प्राप्त होईल.वाचण्यासाठी लिहण्यासाठी प्रथम शिकावे लागते,बाराखडी पाठ असली पाहिजे तरच एका एका अक्षरांना जोडून शब्द तयार करता येतात.मग त्या शब्दात अर्थ प्राप्त होतील अशी रचना …

Read More »

मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग …..

मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग  प्रबोधन हा एक फक्त शब्द आणि विचारच नाही तर अवघ्या मानवी विश्वाला व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरांना योग्य दिशेने, योग्य पध्दतीने प्रभावित करून किंवा संचालित करून समाजाची नव्या दमाने पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया असते.या प्रबोधनातूच लोक, समाज आणि राष्ट्राची जडणघडण होत असते.लोक प्रबोधन म्हणजे?.लोकांच्या स्वाभिमानाची जागृती,लोकांतील अज्ञानाला-अंधश्रध्देला-असहिष्णुतेला तिलांजली.लोकांना त्यांच्या स्वतंत्र व महत्त्वपूर्ण अस्तित्वाबाबत आणि …

Read More »

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन

अशी आहे ठाकरे सरकारची योजना करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्याने ठाकरे सरकारकडून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान दुसरी लाट ओसरली असून रुग्णसंख्या कमी होत असल्याने ठाकरे सरकारकडून लॉकडाउन शिथील केला जाण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत. दरम्यान ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथील करण्याची …

Read More »

राज्यात 130 रुग्णालयात ब्लॅक फंगसवर मोफत उपचार

मुंबई, राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून आज सोमवारी देण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार मिळत आहे. कोरोना महामारीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून याचिका दाखल केली. यावेळी खंडपीठाने ब्लॅक फंगसच्या उपचाराबाबत राज्य सरकारकडे विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत …

Read More »

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तीन गावांचे पुनर्वसन होणार – मुख्यमंत्र्यांनी मागितला प्रस्ताव

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तीन गावांचे पुनर्वसन होणार – मुख्यमंत्र्यांनी मागितला प्रस्ताव मुंबई, वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी व कोळसा तसेच प्रकल्पाच्या बाहेरील वन्यजीव अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा कारवा गावाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अलिकडील काळात राज्यात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, राज्यात सध्या 312 वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर …

Read More »

आरक्षण लाभार्थींनी शासन कर्ती जमात बनावे 

आरक्षण लाभार्थींनी शासन कर्ती जमात बनावे  7 मे 2021 शासनाने काढलेल्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधातील आदेश GR चा विरोध सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी वर्गांच्या संघ,संघटना,असोशियशन,फेडरेशन यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तहसीलदार,जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना लॉक डाऊन जमाव बंदीचे आदेशाचे काटेकोरपणे पालन करून निवेदन दिले,जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नाहीत त्या सर्वांचे मी …

Read More »

आरक्षण व हक्क हे लढून आणि लढूनच मिळत असतात.

आरक्षण व हक्क हे लढून आणि लढूनच मिळत असतात. मराठा आरक्षणाचा सर्वोच्य न्यायालयात निकाल लागल्या नंतर मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाचा मुद्धा असंतोषाचा केंद्र बिंदू ठरत आहे.राज्यात व केंद्रात पंचांशी टक्के ओबीसी,एस सी,एसटी,व्ही जे एन टी,आदिवासी,अल्पसंख्याक इतर मागासवर्गीय कामगार,कर्मचारी आणि अधिकारी यांनी आरक्षणाचा लाभ घेतला आणि विषमतावादी विचारसरणीच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियनची मेम्बरशीप घेऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत केले.शासन यंत्रणेवर दबाव निर्माण करून शासन यंत्रणेचा ताबा घेणे कामगारांचे …

Read More »

हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात?.

हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात?. भारतातील सर्व मान्यताप्राप्त देवाची मंदिर बंद आहेत. कोरोना मुळे आज फक्त दवाखाने म्हणजे विज्ञानाचे दरवाजे खुले आहेत.मोठ्या संख्येने माणस मृत्यू मुखी पडत असतांना त्यांचे अंतिम संस्कार करतांना कोणी नातलग जवळ नसतात तसेच हजारो वर्षा पासून अंतिम संस्कार करतांना ब्राम्हणाच्या सांगण्यावरून होणारा कर्मकांड विधी २०२० /२०२१ मघ्ये होतांना दिसत नाही.त्यामुळे मृत्यू नंतर होणारी माणसांची आणि कुटुंबाची शांती शांतच दिसत आहे.कोणत्याही …

Read More »

चक्रीवादळाचे कोकणात थैमान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस

चक्रीवादळाचे कोकणात थैमान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस मुंबई- रौद्र रूप धारण केल्यानंतरर टौकते चक्रीवादाळाने दिशा बदलत, मुंबईला टाळून थेट कोकण किनारपट्टी गाठली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण आणि गोव्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अन्य भागांमध्ये थैमान घातले. या सर्वच परिसरांमध्ये 60 ते 70 किमी अशा वेगाने आलेल्या वार्‍यांनी प्रचंड नुकसान केले आहे. सोलापूर, पुणे, औरंगाबाद, मराठवाड्याचा बहुतांश भाग, नाशिक, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड, …

Read More »