राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वाळूच्या मागणीच्या तुलनेत पुरवठ्याबाबत वाळू धोरण निश्चित केले जाईल. त्याबाबत शासनाने एक समिती गठीत केली होती. समितीचा अहवालही नुकताच शासनाकडे सादर झाला आहे. हा अहवाल मी लवकरच बघणार आहे. त्यानंतर समितीच्या सूचनेनुसार सर्वत्र अंमलबजावणीतून वाळू माफीयांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल, सध्या राज्यात वाळू माफीयांकडून लुट सुरू आहे. ते एक ट्रक वाळू ६० ते ७० हजार रुपयांना विकतात. वाळूच्या तुटवड्यामुळे बांधकाम व्यवसायिक त्रस्त असून काहींचे कामही प्रभावित झाल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
दोन दिवसांत पालकमंत्रीबाबत चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध जिल्ह्यातील पालकमंत्री नियुक्तीसाठी शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याशी बोलण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. येत्या दोन दिवसांत दोघांशीही याबाबत चर्चा करून सर्व संमतीने पालकमंत्र्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.