Breaking News

पावसाने पिकांचे नुकसान,’महसूल’ने करावा सर्व्हे

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे १० सप्टेंबर रोजी उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाने या परिसरातील नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या गावांना फटका

Advertisements

तालुक्यातील शिवणी, सोनबर्डी, आलेवाडी, लाडणापूर, वसाळी, पिंगळी, करमोडा, चिचारी, सालवन , दयालनगर , हडियामाल, सोनाळा यासह इतर भागात विजेच्या गर्जनेसह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे.

या पिकांचे नुकसान

कपाशी, मका, सोयाबीन पीक पूर्णता जमीनदोस्त झाले आहे. तसेच इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून या पावसाचा परिणाम उत्पन्नावर देखील होणार आहे. तरी ऐन पीक उत्पन्न वाढीच्या बहरात असताना झालेला हा वादळी पाऊस शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कामठी, मौदा, रामटेक, पारशिवनी तालुक्यातील पिकांचे नुकसान : पाऊस इतका झाला नसताना शेतात आणि घरात पाणी

गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वैनगंगा नदी काठावरील ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये …

टमाटरचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात : टमाटरवर फिरवला नांगर

वेळेला पैशापेक्षाही खूप महत्व आहे. हीच बाब टमाटरला लागू पडते. पंधरवडय़ापूर्वी प्रतिकिलो २०० रुपयांचा विक्रमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *