Breaking News

किसान मोर्चाचा कार्यकर्ताच शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करेल – सुधीर दिवे यांचा विश्वास

वर्धा :- (मुंबई) : आजपर्यंत शेतकरी राबराब राबतोच आहे.-स्वातंत्रपासून त्याला वापरूनच घेतल्या गेले. त्यांच्या भरवशावर राजकारण करणारे सुखी झाला दुसरीकडे शेतकरी अजूनही मातीतून नशीब अजमावतो आहे. आता त्यांच्या मदतीला भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे कार्यकर्ते जुळले आहेत. शेतकरी जे पिकवतो त्यावर प्रक्रिया करून तो विकणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होणार नाही, त्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे कार्यकर्तेच मदतगार ठरतील असा ठाम विश्वास भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस सुधीर दिवे यांनी किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
यावेळी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष खा. राजकुमार चाहर, राज्याचे अध्यक्ष माजी कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे, सरचिटणीस वासुदेव नाना काळे, मकरंद कोरडे, रोहित चिवटे तसेच किसान मोर्चा कार्यकारणीचे सर्व प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.
श्री दिवे म्हणाले, देश हा उत्पादनाचे केंद्र व्हावे अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. त्यामुळेच 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO) भरीव मदत करण्यामागे एक धोरण ठरवण्यात आले आहे.

FPO च्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन ही दिवे यांनी केले.

ते म्हणाले, मोदीजींना अपेक्षित असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या तयार व्हाव्यात. यासाठी संस्थात्मक मदत प्राप्त करण्यास भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱयांनी प्रयत्न करावेत.

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *