वर्धा:प्रतिनिधी – एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे गेल्या 3 वर्षापासून आर्वी तालुक्यातील पांजरा, बोथली, उमरी, सुकळी, भादोड , या गावांमध्ये आदर्श गाव घडविण्याचे काम सुरू आहे , प्रकल्पामधून अनेक पर्यावरण पूरक उपक्रम कार्यकर्ते राबवित असतात. यामध्ये झाडे लावणे, पाणी वाचवा मोहीम , वन्य प्राण्यांचे संरक्षण, प्लास्टिक मुक्त गाव, शेततळे, असे अनेक उपक्रम प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात आले , याचे औचित्य साधून दिनांक 5 जून 2021 ला पांजरा येथे वृक्ष लागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला, यामध्ये गावकरी , सरपंच, उपस्तीत होतें , यामध्ये प्रकल्प प्रतिनिधी श्री रवींद्र तांदुळकर व श्री मंगेश पांडे यांनी परिश्रम घेतले.

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा
Advertisements
Advertisements
Advertisements