महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर आता २९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार फोडण्याची रणनिती आखली आहे, असा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते औरंगाबाद येथे शिवसेनेच्या बैठकीत बोलत होते. या विधानामुळे राज्याच्या …
Read More »शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे जबाबदार – आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
राज्यात एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी भाजपाला साथ देत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेत फूट कोणामुळे पडली, अशा चर्चा रंगू लागल्या. काही जणांनी यासाठी भाजपाला, तर काहींनी राष्ट्रवादीला जबाबदार धरलं. यावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीवरून गौप्यस्फोट केला आहे. “शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि …
Read More »शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मंत्रालयात प्रवेश करताना वाद
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन वादाला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांची नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा, या मागणीसाठी बांगर आग्रही होते. तेव्हा पोलिसांनी कार्यकर्त्यांना नियमाप्रमाणे जाऊ न दिल्यानं बांगर संतापले आणि त्यांनी शिवीगाळ करीत हुज्जत घातली. हा वाद सोडवण्यासाठी …
Read More »दम देऊ नका, घरात घुसून मारू : रवी राणा, कुठे यायचे ते सांगा, मार खायला तयार : बच्चू कडू
दम देऊन बोलत असतील, तर घरात घुसून मारण्याची हिंमत ठेवतो. जशास तसे उत्तर देईल. ते ज्या स्तरावर म्हणतील, त्या स्तरावर उत्तर देईन, असा इशारा बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी बुधवारी बच्चू कडू यांना दिला. ते अमरावतीत बोलत होते. बच्चू कडू आणि माझा वाद सीएम, डेप्टी सीएम मिटवला. मी स्वःतही तो वाद मिटवला. मात्र, कुणी मला जर दम देत असेल, तर …
Read More »नागपुरात मिहानमध्ये टाटा करणार गुंतवणूक : गडकरी, फडणवीस प्रयत्नशील
राज्यातील गुंतवणूक बाहेर जात असल्याच्या आरोप सध्या होत आहे. या सध्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाने नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. तसेच विदर्भात उद्योग प्रकल्प यावेत, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्नशील आहेत. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन यांना पत्र पाठवून नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणुकीची …
Read More »शिंदे सरकार कोसळणार?राष्ट्रपती राजवटीचा पर्याय
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष अजूनही सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाने 29 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली असली तरी यातून शिंदे सरकार कोसळणार की पायउतार होणार? हा चर्चेचा विषय आहे. याबाबत घटनातज्ज्ञ काय म्हणतात… वाचा “पक्षांतर बंदी कायद्यानुसार सुरुवातीला बाहेर पडणारे १६ आमदार दोन-तृतीयांश आमदार नाहीत. पण त्यानंतर एक-एक करत अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी दोन तृतीयांशसाठी आवश्यक असणारा ३७ चा मॅजिक आकडा गाठला. …
Read More »प्रकल्प बाहेर जाण्यास ठाकरेच जबाबदार : टक्केवारीमुळे उद्योजक होते नाराज
उद्धव ठाकरेंच्या काळातच महाराष्ट्रातून उद्योग प्रकल्प बाहेर राज्यात गेले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ही प्रक्रिया सुरु झाली नसून ठाकरेंनाच उद्योग राज्यात ठेवण्यास उत्सुकता नव्हती, असा आरोप भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांनी केलाय. टक्केवारी मागीतल्यानेच उद्योग बाहेर गेले, असा आरोप ठाकरेंवर केला जातोय. आता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे 297 एकरवर होऊ घातलेला रांजणगावचा क्लस्टर म्हणजे महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक इको-सिस्टीमच्या विस्ताराची सुरुवात आहे, असे उद्गार …
Read More »तर बुधवारी राजीनामा देणार : अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य
औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे चांदीची गदा घेऊन फिरत आहेत. याचा अर्थ जर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची परवानगी दिली तर बुधवारी प्रसारमाध्यमांत माझ्या राजीनाम्याची ब्रेकींग न्यूज येईल. त्यानंतर मैदानात त्यांनी यावे. कोण गदा घेऊन येतो, कशा पद्धतीने येतो, त्याला आमची ढाल-तलवार कशा पद्धतीने लढा देईल हे सर्वांना दिसेल, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते …
Read More »सरकार मधून बाहेर पडावं, नाहीतर गेम निश्चित! रवी राणा व बच्चू कडू वाद
भाजप समर्थक आमदार रवी राणा विरुद्ध शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू हा वाद विकोपाला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवी राणा यांच्यात आज बैठक पार पडली. यानंतर रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये सागर बंगल्यावर एक बैठक होईल. बच्चू कडू काय म्हणाले? रवी राणा यांनी जी बदनामी केली त्यावर आजच्या बैठकीत आमचं समाधान झालं …
Read More »महाराष्ट्राचे राज्यपाल बदलले? सुमित्रा महाजन यांच्या नावाची सोशल मीडियात चर्चा
विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारापुर्वी 8 राज्याचे राज्यपाल बदलले होते. महाराष्ट्रात अनेक वेळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलावावे, अशी मागणी केली जात होती. मात्र, तसे काही झालेले नाही. देशातील 8 राज्यातील राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल बदलण्यात येणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित आधीही उपस्थित झाला होता. आता सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्रच्या राज्यपाल …
Read More »
विश्वभारत News Website