शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. संजय राऊत अलीकडेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली होती. या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. प्रकरण काय? ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने राऊतांना समन्स बजावला आहे. १ डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले …
Read More »उद्धव ठाकरे वाचाळपणा सोडा, अन्यथा…कोणी केली टीका
“उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री असताना त्यांनी बोलताना भान ठेवावे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होत आहे. मात्र, वाचाळपणा कराल तर एकटे पडाल” असे म्हणत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. शनिवारी बुलडाण्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी शिंदे गटासह भाजपवरही जोरदार टीका केली. त्यावर …
Read More »गुवाहाटी दौरा का नाही? सत्तार म्हणाले, रश्मी ठाकरेंना करा मुख्यमंत्री
उद्धव ठाकरेंकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी कोणतीही कामे केली नाहीत. किमान त्या खुर्ची वर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करा, असा प्रस्तावही मी ठेवला होता. कारण अडीच वर्षात काळात उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले दिसले. मी मंत्री असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय …
Read More »मुख्यमंत्री पदाची डोक्यात हवा गेली नाही, सरकार पाडून दाखवा…
हिंमत असेल तर उद्धव ठाकरेनी सरकार पाडून दाखवावे, आमच्याकडे १७० आमदारांचं बहुमत आहे. माझ्या डोक्यात आजही मुख्यमंत्रीपदाची हवा गेलेली नाही. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. एवढंच नाही तर हाताच्या रेषा दाखवायची आम्हाला गरज नाही, मनगटात ताकद आहे ती दाखवायची ताकद आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. आम्ही मंदिरात जायला …
Read More »काँग्रेस मुख्यालयासमोर हिंदू महासभा उभारणार सावरकरांचा पुतळा
अखिल भारतीय हिंदू महासभेने दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतलाय. वीर सावरकरांवर आक्षेपार्ह मत नोंदवल्याने महासभेने कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली आहे. यासंबंधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वातंत्र्यसेनानींचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांच्या सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केलीय. कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी सातत्याने वीर सावरकरांबद्दल अपमानजनक शब्दांचा वापर करतात. राहुल …
Read More »ग्रामसेवक, सरपंचाला कार्यालयात कोंडले : प्रकरण अवैध धंद्याचं
चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथे ग्रामस्थांसह महिलांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. अनेक दिवसांपासून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करूनही कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा संपल्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांना कोंडून कार्यालयाला कुलूप ठोकले. जामदात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनकडून होत आहे. गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करीत होते. …
Read More »महाराष्ट्राच्या राज्यपालांना पदावरून हटवा : मुंबई हायकोर्टात याचिका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपालांवर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता महाराष्ट्रच्या राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा, राज्यपालांनी अवमान केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. कोणी केली याचिका? याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या वतीने वकील …
Read More »५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित : सरपंचपदाचे आरक्षण चुकले
सरपंच पदाच्या आरक्षणपदाची प्रक्रिया चुकीची केल्याने भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील तब्बल ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. चौकशी करुन दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रकरण काय? राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणूक कार्यक्रमान्वये मोहाडी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींपैकी ५८ ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदाच्या निवडणुका जाहीर …
Read More »खळबळ : तहसीलदार, उपजिल्हाधिकारी वाळू व्यावसायिकांकडून घेतात हप्ते ! आमदारांचा आरोप
अवैध वाळू उपसा करणारे वाळू माफिया तहसीलदार, प्रांत अधिकारी, पोलिसांना हप्ते देतात. दादागिरी करतात, कुणालाही जुमानत नाहीत. राजकीय संरक्षण असल्याशिवाय वाळू माफिया तयार होत नाहीत. माफियांवर करवाई केली तर वरुन फोन येतात, असा आरोप जळगाव जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी केला. अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडल्यास आमदारांनी अधिकाऱ्यांना फोन करु नयेत, असा सल्ला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. जिल्हा नियोजन …
Read More »राज्यपाल कोश्यारी यांना देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर…
छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगाचे आदर्श आहेत, असे वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवप्रेमींच्या टीकेचे धनी ठरत आहेत. त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून सडकून टीका केली जात आहे. त्यांच्या या विधानावर भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या विधानाला थेट घरचा आहेर दिला. फडणवीस काय म्हणाले? “मला वाटत नाही की, …
Read More »
विश्वभारत News Website