पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण होणार आहे. तसेच नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजनही होणार आहे. यावेळी नागपूर रेल्वेस्थानकावर २४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. नागपूर मेट्रोने मोदी प्रवास करतील. त्यासाठी स्थानकावर स्वच्छता ठेवली जात आहे.सोबतच पोलीस विभागानेही चोख नियोजन केले असून शेकडो पोलिसांची बहुस्तरीय सुरक्षा मोदींना पुरवली जाणार आहे. पंतप्रधान ११ डिसेंबरला …
Read More »भ्रष्टाचारी उमेदवार मत मागायला आल्यास अपमान करू
बारामती तालुक्यातील वाघळवाडी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश किसनराव यादव यांनी या निवडणुकीत स्वतःच्या घरावर एक बॅनर लावलाय. तो बॅनर तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. समाजकंटक, भ्रष्टाचारी व भ्रष्टाचाराला अभय देणारा उमेदवार मत मागायला आल्यास अपमान केला जाईल, अशा आशयाचे बॅनर लावले आहे. यादव यांच्या घरात पाच मते आहेत. राज्यात ग्रामपंचायत …
Read More »राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : अब्दुल सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम?
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका करीत शिवीगाळ केली होती. सत्तार यांच्या या कृतीने राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. मंत्रिपदी असताना एका महिला नेत्याला शिवीगाळ करणाऱ्या सत्तार यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करत राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. तसेच काही महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने या मागणीसाठी राज्यपाल …
Read More »माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा-सून अडचणीत : चौकशीचे आदेश
प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या लातूर एमआयडीसीतील भूखंड प्रकरणात आणखी एका चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. एकाच भूखंडावर दोन टप्प्यात मिळालेल्या कर्जाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याचे आदेश सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे म्हटले आहे. याबाबत लातूर भाजपने एक पत्र …
Read More »संजय राऊतांना लवकरच अटक? वाचा…
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. संजय राऊत अलीकडेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली होती. या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. प्रकरण काय? ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने राऊतांना समन्स बजावला आहे. १ डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले …
Read More »उद्धव ठाकरे वाचाळपणा सोडा, अन्यथा…कोणी केली टीका
“उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री असताना त्यांनी बोलताना भान ठेवावे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होत आहे. मात्र, वाचाळपणा कराल तर एकटे पडाल” असे म्हणत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. शनिवारी बुलडाण्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी शिंदे गटासह भाजपवरही जोरदार टीका केली. त्यावर …
Read More »गुवाहाटी दौरा का नाही? सत्तार म्हणाले, रश्मी ठाकरेंना करा मुख्यमंत्री
उद्धव ठाकरेंकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी कोणतीही कामे केली नाहीत. किमान त्या खुर्ची वर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करा, असा प्रस्तावही मी ठेवला होता. कारण अडीच वर्षात काळात उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले दिसले. मी मंत्री असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय …
Read More »मुख्यमंत्री पदाची डोक्यात हवा गेली नाही, सरकार पाडून दाखवा…
हिंमत असेल तर उद्धव ठाकरेनी सरकार पाडून दाखवावे, आमच्याकडे १७० आमदारांचं बहुमत आहे. माझ्या डोक्यात आजही मुख्यमंत्रीपदाची हवा गेलेली नाही. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. एवढंच नाही तर हाताच्या रेषा दाखवायची आम्हाला गरज नाही, मनगटात ताकद आहे ती दाखवायची ताकद आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. आम्ही मंदिरात जायला …
Read More »काँग्रेस मुख्यालयासमोर हिंदू महासभा उभारणार सावरकरांचा पुतळा
अखिल भारतीय हिंदू महासभेने दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतलाय. वीर सावरकरांवर आक्षेपार्ह मत नोंदवल्याने महासभेने कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली आहे. यासंबंधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वातंत्र्यसेनानींचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांच्या सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केलीय. कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी सातत्याने वीर सावरकरांबद्दल अपमानजनक शब्दांचा वापर करतात. राहुल …
Read More »ग्रामसेवक, सरपंचाला कार्यालयात कोंडले : प्रकरण अवैध धंद्याचं
चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथे ग्रामस्थांसह महिलांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. अनेक दिवसांपासून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करूनही कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा संपल्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांना कोंडून कार्यालयाला कुलूप ठोकले. जामदात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनकडून होत आहे. गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करीत होते. …
Read More »
विश्वभारत News Website