Breaking News

राजकारण

नागपुरात 77, औरंगाबादमध्ये 75 विकास सोसायट्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत 11 जिल्ह्यातील 798 विकास संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. शासनाच्या मागणीनुसार राज्य सहकारी बँकेने विकास संस्थांच्या सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून सुमारे 3 कोटी रुपयांइतकी रक्कम संबंधित विकास संस्थांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. सहकारातील त्रिस्तरीय रचनेत राज्य सहकारी बँक ही शिखर संस्थेची भूमिका बजावत आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी संस्थांचा समावेश होतो. कोणत्या …

Read More »

नागपुरला येत असताना काँग्रेसच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. ते नागपूर येथील बैठकीला जात होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान काल त्यांना हदय विकाराचा धक्का आल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असे त्यांचे …

Read More »

आमदार बच्चू कडू यांचा भीषण अपघात, डोक्याला मार

माजी राज्यमंत्री आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात झाला आहे. रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या …

Read More »

“मंत्रीमंडळ विस्तार करा, अन्यथा… “

मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने काही आमदार नाराज आहेत. अपक्ष आमदार बच्चू कडू हे आक्रमक नेते आहेत. हा परिवाराचा विषय आहे. नाराजी असून, नसून चालत नाही. घरामध्ये प्रत्येकाच्या मनासारखे होत नसतं. पण, प्रामाणिक हे आहे की मंत्रिमंडळ विस्तार आता व्हायला पाहिजे, “असे मत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे म्हणजे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले. “शेवटच्या सहा महिन्यात मंत्री बनवतील. महामंडळ …

Read More »

समसमान मत पडल्यास सरपंचांना मतदानाचा अधिकार : उपसरपंच निवडणुकीवर कोर्टाचा निर्णय

उपसरपंचाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत तसेच समसमान मते मिळाल्यास निर्णायक असा अतिरिक्त अधिकार सरपंचाला देणाऱ्या ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली. न्या. मंगेश पाटील व न्या. संतोष चपळगावकर यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अविनाश श्रीराम राठोड यांनी तर औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानदेव रोडे, कविता भोजने, …

Read More »

400 कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यात अडकणार एकनाथ खडसे? चौकशी सुरु

जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे एटीएस पथक दाखल झाले आहे. चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. हे पथक मुक्ताईनगरात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. या 400 कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरचे आमदार …

Read More »

पंकजा मुंडेंना मोठा धक्का ; नड्डांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही

2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाले. जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. नुकत्याच बीड येथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे …

Read More »

नागपुरातील जैन कलार समाजाच्या निवडणुकीत घोळ

जैन कलार समाजाच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत मोठा घोळ झाल्याचा आरोप आपुलकी पॅनलचे अनिल तिडके यांनी पत्रकार परिषदेत केला.नागपूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती तिडके यांनी दिली. काय आहे प्रकरण?👇👇👇 26 डिसेंबरला समाजाची निवडणूक झाली. 27 डिसेंबरला मतमोजणी अपेक्षित होती. मात्र, तसे न होता तीन दिवसांनंतरही संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाल घोषित करण्यात आलेला नाही. याच काळात घोटाळ्यांनी कूच केली. …

Read More »

नागपूर : रामटेकच्या ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश,शेखर दूंडे यांच्या कामाचा धडाका

रामटेक लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील देवलापार आदिवासी भागातील छवारी आणि छवारीटोला या गावातील ग्रामस्थांनी मनसेत प्रवेश केलाय. रामटेक तालुक्याचा विकास थांबला असून यास विद्यमान आमदार आणि खासदार जबाबदार आहेत, असा आरोप करीत अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व पक्षाचे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांच्या बेधडक कार्यप्रणालीमुळे ग्रामस्थांचे सुटणारे प्रश्न लक्षात घेऊन, विद्यमान खासदार …

Read More »

… तर सत्तार यांच्यावर कारवाई : मुख्यमंत्री शिंदे यांचे संकेत

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात सुनावत नोटीस बजावली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व माहिती घेत असून योग्य निर्णय घेऊ, असे नागपुरात सांगितले. काय आहे प्रकरण? राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अब्दुल सत्तार हे महसूल राज्यमंत्री होते. यावेळी त्यांनी वाशिम येथील 37.19 एकर गायरान जमिनीचे अवैध …

Read More »