Breaking News

श्रेय घेण्यासाठी अपूर्ण कामाचे लोकार्पण – आमदार डॉ.पंकज भोयर यांचा आरोप

Advertisements
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी महाआघाडी सरकारने कामाचे श्रेय घेण्यासाठी अपूर्ण कामाचे लोकार्पण केले. असा आरोप आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केला आहे.
आमदार डॉ. भोयर म्हणाले की, भाजपच्या शासनकाळात तत्कालीन वित्तमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम विकास आराखडयाला कोटयवधी रूपयांचा निधी दिला.  या  निधीतून सेवाग्राम-पवनार-वर्धा येथे  अनेक विकासकामे सुरू करण्यात आली. याकरिता वेळोवेळी निधी देण्यात आला. सोबतच लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी दिलेल्या सूचनांना प्राथमिकता देत त्यांचाही आराखडयात समावेश करीत निधी तरतूद करण्यात आली. परंतु, महाविकास आघाडीने या निधीला कैची लावली. यामुळे विकास कामे थांबली आहे. जे काम सुरू करण्यात  आले होते, ते अपूर्ण आहेत.  राज्य सरकारने अस्थिर स्थिती पाहता श्रेय  घेण्यासाठी गांधी जयंतीला अपूर्ण कामाचे लोकार्पण केले. आज ज्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. त्यातील एकही काम पूर्ण झाले नाही,  असेही आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धा लोकसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे खासदार रामदास तडस यांची मागणी

वर्धा लोकसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी, उपमुख्यमंत्री मा. …

आर्वी:आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे केली भाजपा शाखा स्थापित

जिल्हा प्रतिनिधी वर्धा;आर्वी:-आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे भारतीय जनता पक्ष स्थापित करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *