Breaking News

शिक्षकांची अवहेलना कधी थांबणार……..

Advertisements
शिक्षकांची अवहेलना कधी थांबणार……..
भारत सुसंस्कृत देश मानल्या जातो पुर्वीपासुन आपल्या देशाच्या प्रगतीमधे शिक्षकांचे (गुरूचे) स्थान खुप महत्वाचे आहे. उदा. रामायण, महाभारत, या पवित्र ग्रंथ असो किंवा सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांच्या काळातही राज्य कारभारात गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व होते याबाबत इतिहास पुरावा आहे. परंतु आज सगळीकडे सतत शिक्षकांना अवहेलना सहन करावी लागत आहे.आज शिक्षकांचा पगार हा सर्वांसाठी कुतूहलाचा, तसाच ईर्षेचा विषय झाला आहे. अगदी गल्ली ते दिल्ली त्याची चर्चा आहे.शासनाच्या वर्गवारीनुसार शिक्षक वर्ग ३ या संवर्गात येतात (अ आणि ब वर्गांची) चर्चा होत नाही, मात्र (क-वर्ग) सर्वांना खुपतो. त्याचे कारण काय आहेत…
  १. शासकिय सेवेनुसार लाखों सरकारी कर्मचाऱ्यां तुलनेत शाळेच्या संख्येत शिक्षकांची संख्या जास्त आहे.
  २. शिक्षकांचा सरळ संपर्क लोकांशी न येता त्यांच्या लहान मुलांशी येतो. शिक्षक हा विद्यार्थी केंद्रीत असतो.
   ३. शिक्षकांवाचून कुणाचं काही आडत नसल्याने त्याचे महत्त्व कमी झाले.
 ग्रामसेवक, तलाठी, पोलिस, लिपीक इत्यादी, कर्मचाऱ्यांचा आदर होतो.कारण त्यांच्याकडे लोकांची कामे अडकलेली असते म्हणून त्यांना सतत साहेब साहेब संबोधल्या जाते. शिक्षक मात्र मास्तर वगैरे. वगैरे….
शासकीय व न्यायालयीन भाषेत शिक्षक हा नोकर नाही.तो एक समाजसेवक आहे तो समाजातील भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सतत झटत असतो. सतत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटतो . शासकिय सेवेतील एकमात्र शिक्षक हा असा कर्मचारी आहे तो दुसऱ्याच्या मुलांच्या प्रगतीमध्ये स्वतःचा आनंद निर्माण करतो.त्याला सतत 
 माझे 100% विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावे असे वाटते हे विचार व हे दृश्य हा आनंद इतर कोणत्याही कार्यालयात इतर कर्मचाऱ्यात आपणाला बघायला मिळणार नाही. स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत चांगली शाळा चांगले शिक्षक पालक शोधतात. पण पगार व सुटीचा विषय आला की  समाज त्याची अवहेलना करतो याला कोणती संस्कृती म्हणायची. विशेष म्हणजे शिक्षकाच्या पेशात भ्रष्टाचारास वाव नाही. त्यांना वेळेचे बंधन कटाक्षाने पाळावे लागते.
वर्गातील शेकडों शेतकरी मजूर कुटुंबातून आलेल्या विविविध जडणघडणीतल्या मुलांना समजून घेऊन कोणताही भेदभाव न करता योग्य वळण देऊन सुसंस्कृत व आदर्श नागरिक निर्माण करण्याचे कार्य शिक्षक सतत करत असतो.बाहेर हा जो सुव्यवस्थीत जो समाज दिसतो ना, तो शिक्षकांच्या  शिक्षणाचाच परिणाम आहे. एकीकडे शिक्षणाचे महत्त्व मान्य करायचे आणि त्या शिक्षणाचा कणा असलेला शिक्षक याचा उपमर्द करायचा ही कोणती मानसिकता…!
उठसूट कुणीही शिक्षकांबद्दल बोलत आहे. शिक्षकांना काम नाही, फुकटचा पगार घेतात.आज कोरोना काळातही कोणत्याही सुविधा नसतांना आहे त्या  परिस्थितीत विद्यार्थ्यांना स्वतःच्या कौशल्याने  आँनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षक सतत धडपड करत आहे.एवढेच नव्हे तर शिक्षकांची घरोघरी जाऊन, मंदिरात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सतत धडपड सुरू आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुटुंब सर्वेक्षण करत आहे, गावात जाऊन लसिकरण जनजागृती करत आहे.चेक पोष्ट, बाजार अशा ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात  पोलिसांसोबत सेवा देत आहे. एवढे सर्व करूनही शिक्षकांच्या पदरी काय तर फक्त अवहेलना… फक्त अवहेलना….
शेकडों वर्षे शिक्षक साधेपणाने जगत होता तेव्हा तो महान होता परंतु परिस्थिती नुसार शिक्षकांच्या राहणीमानात बदल पडला नियोजन व काटकसरीने जगुन त्यांच्या कडे दोन पैसे दिसू लागले तर लोकांना पोटशूळ उठायला लागले. करोडोंचा भ्रष्टाचार करणारे नेते तुम्हाला चालतात त्यांना आपण सन्मानपूर्वक वागणूक देतो  त्यांच्यापुढे शेपूट घालतो.भ्रष्टाचार करून करोडोंची संपत्ती कमावणारे अधिकारी तुमच्यासाठी आदरणीय साहेब असतात. आणि 
तुमच्या चिमुकल्यांना आईच्या मायेने आणि बापाच्या धाकाने सुसंस्कृत वळण लावणारे आदर्श नागरिक निर्माण करून समाज घडविण्याचे काम करणारे शिक्षक मात्र मास्तरडे… इतर कर्मचारी व अधिकारी यांच्या तुलनेत शिक्षक हा डी.एड, बी. ए. बी. एड, बी. ए. स्सी. बी. एड,  एम ए एड, एम. पि एच डी असा सुशिक्षित असतो.आयुष्यातील पंचवीस वर्षे शिक्षण घेण्यात घालवलेले असतात. पुन्हा पाच वर्षे शिक्षण सेवक किंवा बिनपगारी, असतो, सरते शेवटी मुलांचे चांगले शिक्षण व चांगले लग्न कार्य करत कर्जबाजारी होऊन एक स्वतः चे घर करतो एवढीच त्यांची संपत्ती तरीही समाजाला शिक्षकाचा पगार दिसतो व त्याची अवहेलना होते हि खुप मोठी विसंगती आहे……
दिवसभर एक मिनिट देखील उशीर न करता आपल्या वर्गावर जाऊन नजरेला नजर भिडवून शिकवणारा, सतत विद्यार्थ्यांसमोर आदर्श असणारा घसा कोरडा होई पर्यंत बोलत राहणारा, सतत उभा राहून शिकवणारा शिक्षक काय इतका हीन आहे की कुणी उठसूट त्याची अवहेलना करावी ??
जिल्हा परिषद शाळेला वाईट दिवस आले असताना सुद्धा कित्येक मुख्याध्यापक, शिक्षक यांनी स्वतः कठोर परिश्रम घेत वेगवेगळे उपक्रम राबवित स्वबळावर विद्यार्थी संख्या वेगाने वाढवून लोकवर्गणीतून शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे व आंतरराष्ट्रीय आदर्श शाळेचा दर्जा निर्माण केला आहे ही बाब सुद्धा प्रशंसनीय वंदनीय आहे. कित्येक प्रकारची सरकारी कामे, योजना शिक्षक प्रामाणिकपणे राबवित जनजागृती करीत आलेला आहे..
मुलांना सुट्टी म्हणून शिक्षकांना सुट्टी, ह्यात काय नवल  पण त्यावरही समाज त्याची ईर्ष्या करतो. इतर सगळ्या नोकऱ्या शिक्षणामुळे आहेत.
शिक्षक हा शिक्षणाचा कणा आहे. याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे. ज्या देशात शिक्षकांची अवहेलना करून प्रगतिची अपेक्षा करणे यापेक्षा शोकांतिका आणखी काय असणार?.
शिक्षक आदर मागत नाही. परंतु, तो त्यास पात्र आहे त्याचा आदर जर करता आला नाही तर हरकत नाही पण शिक्षकांची अवहेलना करने कुठेतरी थांबाली पाहिजे हेच माझे समाजाला मागणे आहे……
अनिल चव्हाण– ९७६७८६६९३३/७७९६२८८८८
राज्य शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक आंतरराष्ट्रीय
 जि प शाळा बोराखेडी ता मोताळा,जि बुलढाणा
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *