Breaking News

विश्व भारत

3 तलाठी लाच घेताना अटकेत : मंडळ अधिकाऱ्यांचा पैशांसाठी तलाठ्यावर दबाव?

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर येथील महिला तलाठी लाच घेताना रंघेहाथ सापडली. तसेच एका दुसऱ्या प्रकरणात तलाठी कार्यालयात काम करणारा खासगी इसम सापडला. या घटना ताज्या असताना अकोल्यात एक तलाठी पुन्हा लाचलुचपत विभागाच्या कारवाईत अडकला. त्यामुळे पैसे घेण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून दबाव असतो, असा सूर तलाठ्यांमध्ये दबक्या आवाजात आहे. अकोला प्रकरण काय आहे? शेतजमीनीचे हिस्सेवाटणी‎ करण्यासाठी चार हजारांची लाच‎ घेताना अकोल्यातील …

Read More »

नागपुरात प्रेम प्रकरणातून तरुणावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला; “ती माझीच आहे, लांब रहा…”

“ती माझीच आहे”, असे म्हणत दोन तरुणांनी एका तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मोहम्मद सोहेल मोहम्मद शकील (वय 24) असं जखमी तरुणाचं नाव आहे. तो सजावटीचं काम करतो. या प्रकरणी पोलिसांनी वनदेवी नगर येथील सय्यद इर्शाद (वय 23) आणि शोएब अन्सारी (वय २23) या दोघांना अटक केली …

Read More »

जुनी पेन्शन योजना लागू केल्यास…फडणवीस यांचे मोठे विधान

राज्यातील शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यावरून आक्रमक झाले आहेत. या योजनेबाबत आज विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केले. जुन्या पेन्शनसाठी आर्थिक तरतूद करावी लागेल. ही योजना लागू केल्यास 2030नंतर राज्यावर आर्थिक बोजा वाढेल, त्यामुळे ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, त्यांचा अभ्यास आम्ही करत आहे. या प्रश्नावर चर्चेतून मार्ग काढू, संप नको, …

Read More »

शेतीवर अतिक्रमण : नकाशे होणार अद्ययावत

भारतीय सर्वेक्षण विभागातर्फे तब्बल 30 वर्षांनंतर महाराष्ट्रात ‘टोपोशीट’ बसविण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 556 टोपोशीट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे नव्याने नकाशे तयार करण्यासाठी या टोपोशीटचा वापर होणार आहे. यासह राज्यात कोरस बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक रोअर बेस स्टेशनच्या परिघातील अक्षांश व रेखांश टाकल्यास जागेचा महसूल नकाशा मिळतो. या दोन्ही सुविधांमुळे राज्यातील शहर, जिल्हे, गावांचे …

Read More »

राज्य अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळाले? वाचा ठळक मुद्दे

राज्याचा अर्थसंकल्प ठळक मुद्दे अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) …

Read More »

मंत्र्याची व्यथा व अश्रू : 7/12वर नाव लावण्यासाठी दिग्गज नेत्याचा संघर्ष

पतीच्या निधनाला 18 वर्ष झाली. पण यानंतर मलाही संघर्ष करावा लागला, असे माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, यावेळी त्यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाबाबतची माहितीही त्यांनी दिली. ‘घरासाठीचे प्रॉपर्टी राईट्स आपण किती दिवसांपासून आणले आहेत. आपण नियम बनवले आहेत. 7/12 वर महिलांची नावं चढतात का? माझं उत्तर आहे नाही. मी दुसऱ्यांचं उदाहरण देणार नाही, मी माझं स्वत:चं उदाहरण तुम्हाला …

Read More »

नागपुरात समृद्धी महामार्गावर द्राक्षाचा ट्रक उलटला

बंगलोर येथून द्राक्षे भरून नागपूरला येणारा ट्रक समृद्धी महामार्गावर बुधवारी सकाळी उलटला. या आठवड्यात समृद्धी प्रवेश व्दारावर घडलेला हा तिसरा अपघात आहे. या घटनेत ट्रक चालक अभिजीत मंडल जखमी झाला.बंगलोर येथून द्राक्षे भरून ट्रक क्र डब्ल्यू बी ६७ सी १३४४ ने समृद्धी महामार्गाने नागपूरला येत असताना अनियंत्रित होऊन उलटला. ट्रकमधील द्राक्षाचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जखमी चालक …

Read More »

आयएएस अधिकाऱ्याने केली होती बच्चू कडूविरोधात पोलिसात तक्रार : शिक्षा

माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2017 सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आज अखेर न्यायालयाने बच्चू कडू यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली …

Read More »

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरघोस मदत : अधिवेशनात घोषणा!

जळगाव,धुळे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांना मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले.अवकाळी पावसात कांदा, गहू, मूग आणि हरभरासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.अवकाळी पावसामुळे नुकसानीचा तात्काळ पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्याचे अश्वासनही …

Read More »

नागपूर झेडपी सभापतीने शासकीय फर्निचर दिले आंदणात : राजकीय चर्चा

नागपूर जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापतींच्या सरकारी निवासस्थानांवरील फर्निचर गायब झाल्याची जोरदार चर्चा झाली. हा मुद्दा अलीकडे चांगलाच गाजला. यामुळे सत्तापक्ष अडचणीतही आला होता. सुरुवातीला हा मुद्दा लावून धरणाऱ्या विरोधीपक्षाला सर्वसाधारण सभेदरम्यान मात्र या मुद्दाचा विसर पडला. विरोधकांनी रागाच्या भरात सभात्याग केला आणि माजी सभापतींचा जीव भांड्यात पडला. परंतु, यामुळे काहीजण दुखावल्याची चर्चा आहे. फर्निचर कोणी नेले? जिल्हा परिषद अध्यक्ष, …

Read More »