नागपूर : महसूल, परिवहन, वन, सिंचन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, गृह विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या या आठवड्यात होणार आहेत. मात्र, यात होणारा गैरव्यवहार थांबवावा, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात काम केल्यानंतरही काही सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर अन्याय झालेला आहे. काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीला एक-दोन वर्ष शिल्लक असूनही घराजवळ नोकरीचे स्वप्न …
Read More »विषमुक्त शेती गावागावात तयार व्हावी! – जागतिक पर्यावरण दिनी सोडावा संकल्प
विषमुक्त शेती गावागावात तयार व्हावी! – जागतिक पर्यावरण दिनी सोडावा संकल्प नागपूर, चीननिर्मित कोरोना विषाणुने जगात धुमाकूळ घातला. यामुळे मानवाने आपण निसर्गापुढे किती फिके पडतो, याचाही अनुभव घेतला. मागील टाळेबंदीने जागतिक पातळीवरील पर्यावरणाचा समतोल वाढला होता. शिवाय प्रदूषणही घटले होते. सर्वांना शुद्ध हवा मिळू लागली होती. पंजाबातील लोकांना तर थेट हिमालयाचे दर्शन घडले होते. हा सर्व चमत्कार प्रदूषणाची पातळी …
Read More »शाळांनी साहित्य विक्रिचा गोरखधंदा बंद करावा – विदर्भ पालक संघटनेची मागणी
शाळांनी साहित्य विक्रिचा गोरखधंदा बंद करावा – विदर्भ पालक संघटनेची मागणी नागपूर, शाळांनी विद्यार्थ्यांना पुस्तक, वही आणि इतर शालेय साहित्य विकण्याचा जो गोरखधंदा सुरू केला आहे तो तत्काळ बंद करावा अशी मागणी विदर्भ पालक संघटनेचे अध्यक्ष संदीप अग्रवाल यांनी केली आहे. एका प्रसिद्धी पत्रकात अग्रवाल म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी शाळांद्वारे शालेय पुस्तके आणि साहित्यांच्या नावावर पालकांकडून कोट्यवधी …
Read More »पदोन्नतीमधील आरक्षण आणि महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा,
पदोन्नतीमधील आरक्षण आणि महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा, राज्यातील जवळपास साडेपाच लाख मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना सेवाकाळात मिळणारा पदोन्नतीचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या दि.७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे बंद झाला आहे. ७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे एकिकडे मागासवर्गीयांची आरक्षित बिंदुनामावली नुसार येणारी ३३ टक्के पदे नष्ट करुन ती खुल्या प्रवर्गात वर्ग केल्याने आरक्षित प्रवर्गातून पदोन्नती मिळण्याचा मार्ग शासनाने बंद केला, …
Read More »महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचे तापमान देशात सर्वाधिक उष्ण
महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचे तापमान देशात सर्वाधिक उष्ण नागपूर –विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी पारा चाळीशी पार पोहोचला. सोमवारी ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी पारा चाळीशी पार पोहोचला. सोमवारी ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल अकोल्यात ३९.५ आणि चंद्रपुरात ३९.४ अंश सेल्सिअस …
Read More »दीनदयाल थालीचा १२०० रुग्ण नातेवाईकांना आधार
*महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून घडतेय सेवाकार्य* *नागपूर.* नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना १० रुपयांत पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या दीनदयाल थाली प्रकल्पाचा हजारावर नागरिकांना लाभ मिळत आहे. नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून घडणारे सेवाकार्य अनेकांसाठी मोठा आधार झाला आहे. नागपूर शहरात मध्य भारतातील सर्वाधिक खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय …
Read More »पदवीधर निवडणूक : नागपुरातून भाजपचे संदीप जोशी रिंगणात
नागपूर, 09 नोव्हेंबर : राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती मदतारसंघात पदविधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. त्याममध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून महापौर संदीप जोशी, औरंगाबाद येथून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख व अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन …
Read More »नागपूर सिटिझन्स फोरमच्या ब्लॅंकेट वाटप अभियानाचा वाडी येथून शुभारंभ
मुळ छत्तीसगड येथील 20 प्रवासी मजूर कुटुंबांना मदतीचा हात या थंडीत दान करा थोडीशी मायेची उब, नागपूर सिटिझन्स फोरमचे आवाहन, वाडी येथून ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ समाजातील वंचित व गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी नागपूर सिटिझन्स फोरमने पुढाकार घेतला आहे. फुटपाथ व रस्त्याच्या कडेला राहून स्व कष्टाने जगणार्यांसाठी फोरमने उपक्रम हाती घेतला आहे. ” या थंडीत दान करा थोडीशी मायेची …
Read More »अन्न, वस्त्र, निवारा मिळेल या दिशेने प्रयत्न करणे ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना – नितीन गडकरी
-भाजपाच्या आत्मनिर्भर कार्यालयाचे उद्घाटन नागपूर- समाजातील गरीब, मागास, बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्माण करून त्यांना आपल्या पायावर उभे करून रोजगार उपलब्ध करून देऊन सुखी, संपन्न, शक्तिशाली करणे, त्यांचे जीवनमान बदलून टाकून अन्न, वस्त्र, निवारा मिळेल या दिशेने प्रयत्न करणे ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना आहे. ती साकार करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय जनता …
Read More »आंबेडकरी विचारवंत प्रा. सुशीला मूल-जाधव यांचे निधन
नागपूरः ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत, लेखिका प्रा. सुशीला मूल -जाधव (वय ८१) यांचे बुधवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास स्थानिक कामठी मार्गावरील व्हिनस हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. प्रा. मूल-जाधव या काही दिवसांपासून नागपूर येथे राहत होत्या. २९ ऑगस्ट रोजी कोव्हिड-१९ आजारामुळे त्यांना कामठी मार्गावरील आशा …
Read More »
विश्वभारत News Website