Breaking News

पर्यावरण

आजपासून थंडीचा कडाका जाणवणार

थंडीचा प्रभाव वाढत आहे. हिमालयीन भागात एक डिसेंबरपासून पश्चिमी चक्रावात पूर्णपणे सक्रिय होणार आहे. परिणामी राज्याच्या सर्वच भागात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार आहे. दरम्यान बुधवारी राज्यात थंडीचे प्रमाण वाढले असून, किमान तापमानाचा पारा सरासरीच्या 3.3 अंश कमी झाला आहे. हवामान विभागानुसार, 2 आणि 3 डिसेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार …

Read More »

धक्कादायक : ६५ वर्षीय महिलेला बिबट्याने १०० फूट फरफटत नेले

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे परिसरात खडके वस्तीवरील ६५ वर्षीय महिलेला बिबट्याने १०० फूट फरफटत नेऊन फडशा पाडल्याची घटना घडली.तालुक्यात बिबट्याने दुसरा बळी घेतला असून नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. घटना कशी घडली? खडके वस्तीवर रखमाबाई तुकाराम खडके ( वय ६५ वर्षे) या राहत असुन काल रात्री त्या सपराच्या घरात झोपल्या होत्या. मध्यरात्रीनंतर बिबट्याने घरात प्रवेश करुन त्यांच्यावर हल्ला केला. …

Read More »

नाशिक : सागवनाची कत्तल

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील चिखली गावाजवळ वनविभागाने सव्वा लाख किमतीचे सागवान लाकूड जप्त केले. चिखली गावानजीक वनविभागाच्या कंपार्टमेंटमध्ये मौल्यवान सागाच्या झाडांची कत्तल करुन ते गुजरात राज्यात विक्री करण्याची तयारी असल्याचे कळते.तसेच यासंदर्भात वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभाग प्रादेशिकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार दि.(२३) रोजी मध्यरात्री सापळा रचला. सव्वा लाखाचा माल जप्त सागवान झाडांची कत्तल करुन ठेवलेले …

Read More »

झाडांची बेकायदा कत्तल : तीन अधिकारी निलंबित

झाडांची बेकायदा कत्तल केल्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. संजीव प्रल्हाद राक्षे, मच्छिंद्र नामदेव कडाळे, भरत रामभाऊ पारखी अशी या तिघांची नावे आहेत. त्यांनी परवानगीशिवाय झाडांची कत्तल केल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता निगडीतील सावरकर उद्यान; तसेच चिंचवडच्या दत्तनगर …

Read More »

सातारा : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची तीन पिल्ले

सातारा जिल्ह्यातील कराड गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या बाजूस उसाच्या शेतात ऊस तोडणी कामगारांना बिबट्याची तीन पिल्ले दिसली. काय झाले नेमके? सोमवारी दोन वाजण्याच्या सुमारास ही पिल्‍ले कामगारांना दिसली. शेतकरी प्रशांत तुकाराम यादव यांच्या शेतात बिबट्याची पिल्ले आढळली.स्‍थानिकांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. काही वेळातच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने वनवासमाची परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वनअधिकाऱ्यांनी …

Read More »

भंडारा साकोली मार्ग : वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

भंडारा जिल्ह्यातील साकोलीजवळील मोहघाटा जंगल शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. ही घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली. तातडीने वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शरीरावरील जखमा व अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. २७ जुलै २०२२ रोजी मोहघाटा परिसरात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या याच बिबट्याने बीटरक्षक सानप यांच्यावर हल्ला करुन जखमी केले होते, अशी माहिती वन …

Read More »

वाघ तस्कर जाळ्यात : नागपूर व भंडारा वनविभागाची कारवाई

भंडारा जिल्ह्यातील नाकडोंगरी वन परिक्षेत्रातील गोबरवाही येथे वाघ नखांसह वन्य जीवांच्या विविध अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर व भंडारा वन विभागाच्या फिरते पथकांनी शनिवारी सायंकाळी संयुक्‍तपणे केली. आरोपींकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले असून, यामध्‍ये 15 वाघनखे, 3 सुळे दात, 10 जोड दात (दाढ), 5 किलो हाडांचा समावेश आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, संजय श्रीराम पुस्तोडे …

Read More »

विदर्भाला हुडहुडी ; राज्यातही पाच दिवस कडाक्याची थंडी

राज्यभरात थंडीची हुडहुडी सुरू झालीय. येत्या काही दिवसात विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पारा घसरून थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि कोकण किनारपट्टीलाही कडाक्याच्या थंडीचा इशारा मिळालाय. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत वातावरण कोरडे असून, पुढील काही दिवस या ठिकाणी कडाक्याची थंडी पडणार …

Read More »

वाघाच्या हल्ल्याविरोधात वनविभागाचे शेताला संरक्षण

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्याच्या घटनामुळे शेतातील धानपिकांची कापणी लांबणीवर पडत आहे.जंगलालगत असलेल्या गावांमध्ये महिलांचे धानकापणीला जाण्याचे धाडस होत नाही. या परिस्थितीमुळे धान कापणी कशी करायची? असा प्रश्न उपस्थित झालेला होता. यावर आता वनविभागाने जंगलालगत शेतावर खडा पहारा देण्यास सुरूवात केलीय. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वनविभागाने हा प्रयोग केला आहे. वन्यप्राण्यांचा वावर असलेली गावे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका हा …

Read More »

लातूर : किल्लारी परिसरात पुन्हा भूकंप

लातूर जिल्ह्यातील किल्लारी व परिसरातील गावांना येथे आज शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास भूकंपाचा सोम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची नोंद 2.4 अशी झाली आहे. रात्री लोक गाढ झोपेत असताना दोन वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून मोठा आवाज आला व जमीन हादरली. यामुळे किल्लारी, किल्लारी वाडी, यळवट, शिरसल, मंगरुळ जुने किल्लारी, एकोंडी गावातील नागरिक घराबाहेर आले. घाबरून नागरिकांनी रात्र घराबाहेरच जागून काढली. …

Read More »