Breaking News

पर्यावरण

आजपासून (सोमवार)थंडी आणखी वाढणार!

मिचाँग चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर आता भारताच्या बहुतांश भागात थंडीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रिय झाल्याने उत्तर ते मध्य भारत गारठण्यास सुरुवात झाली आहे. तेथील किमान तापमान 5 ते 10 अंशांवर खाली आले आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप थंडी नाही. राज्यात 18 डिसेंबरपासून थंडी सुरू होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. शुक्रवारी उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये किमान …

Read More »

विदर्भातील वाघ ओडिसात पोहचला : दोन हजार किलोमीटरचे अंतर कसे केले पार? वाचा

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघाने १४ महिन्यात तीन हजाराहून अधिक किलोमीटरचे अंतर पार केले होते. त्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील वाघ तब्बल दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करून ओडिशात पोहोचला आहे. या वाघाला ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वाघांचे स्थलांतरण, त्यांचा कॉरिडॉर आणि सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील महेंद्र परिवनक्षेत्रात …

Read More »

मराठवाड्यात पावसाला सुरुवात : सिल्लोडच्या केळणा नदीला पूर : सोयगावमध्ये रिपरिप

महिनाभर खंड पडलेल्या पावसाला बुधवारपासून औरंगाबादमध्ये रिपरिप सुरुवात झाली. गुरुवार आणि शुक्रवार रोजी पावसाचा जोर वाढल्याने सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड,भराडी,अंभई, अजिंठा,गोळेगाव (बु.), आमठाना,निल्लोड,बोरगाव बाजार या आठही मंडळात चांगला पाऊस झाला. खेळणा धरणात आवक सुरू पावसाने काही प्रमाणात तग धरलेल्या सोयाबीन,मका,कापूस,तुर अशा पिकांना जीवदान मिळाले. या पावसामुळे बळीराजा आनंदीत झाला असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातील शेखपुर जांभई, अंभई, केळगाव,मुर्डेश्वर या …

Read More »

नागपूरच्या पर्यावरणनगर उद्यानात साप : सर्वत्र दुर्गंधी, मनपा-नासूप्रची चालढकल

नागपूर शहरातील उद्यानांची स्थिती योग्य असल्याचे सांगणाऱ्या नासुप्रच्या दाव्यांची महापालिकेच्या समितीने पोलखोल केली होती. तरीही, अजूनपर्यंत उद्याने दुरुस्त करण्यात आलेले नाही. वर्धा मार्गांवरील पर्यावरणनगर मधील उद्यानाचा वाली कोण? असा प्रश्न आहे. जेवण उद्यान शेवटच्या घटका मोजत आहे का? असे चित्र आहे. येथे साप आणि अन्य लहान-मोठे धोकादायक जीव दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पर्यावरणनगरातील उद्यानाची जबाबदारी महापालिका …

Read More »

नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे पडली : जोरदार पावसाची प्रतीक्षा

नागपूरमध्ये रविवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे कुठे भिंत पडली, कुठे वाहनांवर झाड पडल्याने नुकसान झाले. खूप दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वातावरणात प्रचंड उकाडा होता. कुलर, पंखे गारवा देईनासे झाले होते. पिके चांगली असली तरी ऑक्टोबर हिट सारखे वातावरण झाल्याने शेतीचे नुकसान होत होते. परंतु अचानक पावसाने पुनरागमन केल्याने शेतकरी काहीसा आनंदी झाला.अनेक दिवसांपासून जिल्ह्यात …

Read More »

सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस : दुष्काळाचे सावट

देशात सर्वच भागात सप्टेंबर महिन्यात पडेल. मात्र, तो एकसारखा राहणार नाही. सरासरी 91 ते 109 टक्के पाऊस पडेल असा अंदाज असला तरी बहुतांश भागात सरासरीपेक्षा 9 ते 10 टक्के कमीच राहील, तसेच यावेळी ऑगस्टमध्येच तापमानात मोठी वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरूवारी दिली. दरम्यान यंदाच्या ऑगस्टमध्ये शंभर वर्षातील सर्वात नीचांकी पाऊस झाल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय …

Read More »

गोंदियात 3 बिबट्यांची शिकार

वीज प्रवाह सोडून तीन बिबट्यांची शिकार करण्यात आल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगाव मार्गावरील बिसेन यांच्या राईस मिलला लागून असलेल्या जंगलात घडली. सोमवारी रात्री गावकऱ्यांना हे बिबट मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान या प्रकाराची गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. वडेगाव येथील काही गावकऱ्यांनी या घटनेची माहिती रात्री ९:३० वाजताच्या सुमारास वनखात्याला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने …

Read More »

123 वर्षांतील सर्वात कोरडा ऑगस्ट : काही ठिकाणी टँकर सुरू, सप्टेंबरकडे लक्ष

जूनपाठोपाठ यंदाचा ऑगस्ट महिनादेखील गत १२३ वर्षांतील सर्वात कोरडा महिना ठरणार आहे. संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्याच्या २३ दिवसांत फक्त ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याआधी सर्वात कमी पाऊस ऑगस्ट २००५ मध्ये १९०.१ मिलिमीटर इतक्या सर्वात कमी पावसाची नोंद होती. तो विक्रम २०२३ च्या ऑगस्ट मोडीत काढला आहे. गत दीडशे वर्षात सहावेळा भारतात अल निनो सक्रिय होता. त्यात पाचवेळा भारताला दुष्काळाचा …

Read More »

राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली, मंत्र्याने दिले संकेत

जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे. रोज आकाशात ढग गर्दी करतात, पावसाचे वातावरण तयार होते, मुसळधार पाऊस होईल असे वाटते. मात्र पाऊसच पडत नाही. पावसाळ्यात २१ पेक्षा अधिक दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे कशीबशी उगवलेली पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृत्रिम पाऊस पडण्याचे संकेत …

Read More »

एकाच गावात चार वाघ दिसल्याने गावकऱ्यामध्ये भीती

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी गावातील शेताशिवारातील झुडपी जंगलात एक वाघ, वाघीण आणि दोन शावकांसह ४ वाघ फिरत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, याबाबतीत सावली वनविभाग अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. गावाला लागून असलेल्या शिवमंदिराजवळ गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चार वाघ दिसल्याने नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. वाघांनी रानडुकराची शिकार केल्याचे दिसून आले. सदरची …

Read More »