Breaking News

प्रादेशिक

बेरोजगार उमेदवारांनी वैफल्यग्रस्त परिस्थितीतून बाहेर यावे : अमोल यावलीकर

बेरोजगार उमेदवारांनी वैफल्यग्रस्त परिस्थितीतून बाहेर यावे : अमोल यावलीकर 37 उमेदवारांनी घेतला वेबिनारचा लाभ चंद्रपूर दि. 30 एप्रिल:  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. 28 एप्रिल 2021 रोजी वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास 37 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. …

Read More »

रुग्णालयाच्या अवाजवी बिलांसाठी मनपामार्फत २१ ऑडिटरची नियुक्ती

खात्री करा; मगच भरा खासगी हॉस्पिटलचे कोरोना बिल रुग्णालयाच्या अवाजवी बिलांसाठी मनपामार्फत २१ ऑडिटरची नियुक्ती चंद्रपूर, ता. ३० : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये चंद्रपूर शहरातील काही खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. मात्र, शासनाने निर्धारीत केलेल्या शुल्क पेक्षा अधिक अवाजवी दराने देयके आकारुन खाजगी रुग्णालय कोरोना रुग्णांकडून रक्कम वसूल करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या …

Read More »

मरणावरीही किर्ती राहील, या कलाकाराची !

मरणावरीही किर्ती राहील, या कलाकाराची ! सध्याच्या विषाणू संक्रमणाच्या काळात बारा दिवसांच्या अविश्रांत धावपळीनंतर, सरळ रेषांचा हृदयविद्युत आलेख (Electrocardiogram) दाखवत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जीवलग बालमित्र गमावल्याची जाणीव करून दिली तो क्षण आजवरच्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट आणि वेदनादायी होता. या अशा क्षणाची आम्ही कधीही कल्पना केलेली नव्हती. तत्क्षणी भावनेने तुडुंब भरलेला बांध फुटण्याआधी स्वतःला सावरत कसाबसा पहिला फोन केला तो दुसऱ्या बालमित्राला, …

Read More »

महाराष्ट्र व कामगार दिनाचा इतिहास.

महाराष्ट्र व कामगार दिनाचा इतिहास. जगात कोरोनाने हाहाकार माजविला असतांना कोणताही उत्सव साजरा करू नये.असा निर्णय शहाण्या माणसांनी घेतला पाहिजे. भारतीय संविधान भारतीय नागरिकांना तसे वागण्याची विनंती करते.आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य व केंद्र सरकार जी काही आपत्कालीन उपाय योजना करतात ती दक्षता भारतीय संविधानात लिहून ठेवली आहे. त्यानुसार भारतीय नागरिकांनी वागले पाहिजे.आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब कुटुंब सुरक्षित तर परिसर सुरक्षित,परिसर …

Read More »

अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा मुबलक पुरवठा करा

अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा मुबलक पुरवठा करा महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर, ता. २८ : सध्या कोरोना विषाणुचा  वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत अँटीजन व आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारुन मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात अँटीजन व आरटीपीसीआर किटची आवश्यकता आहे. त्यामुळे महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा …

Read More »

भानापेठ, गंजवॉर्डातील तीन दुकानदारांना दंड

भानापेठ, गंजवॉर्डातील तीन दुकानदारांना दंड मनपाची कारवाई :  १२ हजारांचा दंड केला वसूल चंद्रपूर, ता. २८ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. …

Read More »

कोरोनाने कंत्राटी कामगार आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले

कोरोनाने कंत्राटी कामगार आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले, भारतीय कामगार कायद्यानुसार कायमस्वरूपी कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार ठेऊ नये तर त्याजागी कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी साठी 1975 ते 1990 पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियने कायदेशीर लढाई लढत असतांना कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.त्याला पळवाट काढून भांडवलदार व त्यांच्या प्रणित कामगार ट्रेंड युनियन ने ठेकेदारी अधिनियम …

Read More »

पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षली ठार   – एटापल्ली तालुक्यातील घटना 

पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षली ठार – एटापल्ली तालुक्यातील घटना अहे- गट्टा-जांबिया जंगल परिसरात नक्षल असल्याची गोपनीय माहिती पोलीस विभागाला प्राप्त झाली होती. त्या मिळालेल्या माहितीवरून आज सकाळच्या सुमारास शोधमोहीम राबवीत असतांना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. पोलीस जवानानेही नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर देत दोन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्रां अंतर्गत …

Read More »

15 मे पर्यंत कडक निर्बंध…उद्या होणार घोषणा   – मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

15 मे पर्यंत कडक निर्बंध…उद्या होणार घोषणा – मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लागू असलेले टाळेबंदीसदृश्य कडक निर्बंध आणखी 15 दिवसांसाठी वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची औपचारिक घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या शुक्रवारी करणार आहेत. राज्यात कडक निर्बंध असतानाही कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत असल्याने, निर्बंधांचा कालावधी आणखी 15 …

Read More »

सीरम, बायोटेकने लसीच्या किंमती कमी कराव्या : केंद्र सरकार

सीरम, बायोटेकने लसीच्या किंमती कमी कराव्या : केंद्र सरकार नवी दिल्ली- कोरोना महामारीसारख्या संकटात कंपनींच्या नफा कामविण्यावर अनेक राज्यांनी टीका केल्यानंतर केंद्र सरकारने सोमवारी पुण्यातील सीरम संस्था आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीला लसींच्या किमती कमी करण्यास सांगितले आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लस किंमतीच्या मुद्यांवर चर्चा झाली. आता या दोन्ही कंपन्या त्यांच्या लसींसाठी …

Read More »