राज्यातील तलाठी पदाच्या चार हजार 122 पदांची भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त एक हजार 12 आणि नव्याने निर्माण केलेल्या तीन हजार 110 या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी …
Read More »शिक्षकाने विद्यार्थ्याच्या हातावर चालवले ‘ड्रिल’मशीन
पाढा वाचता येत नाही म्हणून एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला शिक्षा देण्यासाठी त्याच्या हातावर ड्रिल मशीन चालवले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये घडली. विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, शिक्षण अधिकार्यांची याची गंभीर दखल घेतलीय. कानपूरमधील प्रेमनगर य़ेथील प्राथमिक शाळेत विबान पाचवीच्या वर्गात शिकतो. त्याला दोनचा पाढा अनुज नावाच्या शिक्षकांनी वाचायला सांगितलं. त्याला पाढा वाचता आला नाही. संतापलेल्या शिक्षकाने …
Read More »नागपूर विद्यापीठात खळबळ! लैंगिक छळ आणि १६ लाख
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एक खळबळजनक व धक्कादायक प्रकार समोर आले आहे. नागपूर विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी आणि जनसंवाद विभागाचे प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी विभागातील सात प्राध्यापकांना त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार आली असल्याचे बोलून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. लैंगिक शोषणाच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 16 लाख रुपये घेतल्याची तक्रार सातही प्राध्यापकांनी कुलगुरू, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली. काय आहे …
Read More »पोलीस भरती टप्याटप्याने? : वय झालेल्या युवकांनाही संधी
विश्व भारत ऑनलाईन : पोलीस भरतीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यात करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळावी आणि सर्व प्रवर्गातील तरुणांचा समावेश व्हावा, या उद्देशाने अटीमध्ये बदल केला जाऊ शकते. विशेषत: मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये, असाही प्रयत्न असल्याचे समजते. पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने तरुण वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटली. तरुणांनी यावरून समाजमाध्यमांमध्ये …
Read More »पोलीस भरती लांबणीवर
विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील पोलीस भरतीबदद्ल महत्वाची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीकडे अनेक तरुणांचे लक्ष लागले होते. अनेक तरुण-तरुणींनी तयारी केली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. याचे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे राज्यातील तरुण-तरुणींना पोलीस भरतीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. भरती लांबली असली तरी लवकरच नव्याने तारखा घोषित होतील, असे कळते.
Read More »तरुणांनो, लक्ष द्याच ! तीन महिन्यांत पोलिस, तलाठी पदांची भरती
विश्व भारत ऑनलाईन : राज्याच्या 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद, यात मंजूर पदांची संख्या 10,70,840 इतकी आहे. पैकी जवळपास पावणेतीन लाख पदे रिक्त आहेत. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांची सव्वादोन लाख तर जिल्हा परिषदेच्या 65 हजार पदे रिक्त आहेत. आता शिंदे- फडणवीस सरकारने त्यातील 75 हजार पदांच्या भरतीची तयारी सुरू केली आहे. पहिल्यांदा पोलिस व तलाठी भरती होईल. त्याचप्रमाणे आरोग्य, …
Read More »जिल्हा परिषद पदभरती रद्द :१३ हजार पदांची प्रक्रिया रखडली
विश्व भारत ऑनलाईन : जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५१४ पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जातील तपशीलामध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. ग्रामविकास विभागाकडून १८ सवर्गांच्या गट क च्या १३ हजार ५१४ पदांसाठी मार्च २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध …
Read More »शाळेत नापास, पण आता IAS, IPS अधिकारी, वाचा यशोगाथा
विश्व भारत ऑनलाईन : देशातील सर्वात ‘टफ’ परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाची(यूपीएससी) असते. विद्यार्थी दिवसरात्र एक करून मेहनत घेतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार आयएएस, आयपीएस होतात. पण, आयपीएस,आयएएस अधिकारी होणे वाटते तितके सोपी नाही. पण आज आम्ही अशाच काही आयएएस अधिकाऱ्यांची यशोगाथा सांगणार आहोत. हे आयएएस,आयपीएस अधिकारी शाळेत नापास झाले होते. पण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी उत्तीर्ण झालेत. रुक्मणी …
Read More »कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार? शिक्षण मंत्री केसरकरांचे मोठे वक्तव्य
विश्व भारत ऑनलाईन : पटसंख्या कमी असलेल्या 14 हजार मराठी शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत.जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेड्यातील या शाळा बंद केल्या तर …
Read More »नागपूर, औरंगाबाद, कोकणमध्ये शिक्षक ; तर नाशिक, अमरावतीत पदवीधर निवडणुकीची घोषणा
विश्व भारत ऑनलाईन : नाशिक, अमरावती विभागात पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण मतदारसंघांतील शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचा बिगुल सोमवारी वाजला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली. येत्या १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज करता येईल, प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. अर्ज उपलब्ध निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. …
Read More »