Breaking News

भादोड भाईपूर पुनर्वसित गावामध्ये विभागांचा प्रताप – आधी केले रस्त्यांचे डांबरीकरण, त्यावर मजीप्रा चालवत आहेत जेसीबी

Advertisements

हा तर शासनाने दिलेल्या निधीचा अपव्यय – निखिल कडू अध्यक्ष निम्म वर्धा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती

Advertisements

आर्वी :- निम्म वर्धा प्रकल्पा अंतर्गत बाधीत गावातील १८ नागरी सुविधांची देखभाल दुरुस्ती करीता मिळालेल्या ३५ कोटी रूपयांतून पुनर्वसित गावांचे चहरे पालटण्याची आशा होती. यासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला, पाणीपुरवठाची कामे मजीप्राला, विद्युत रोषणाई व दुरुस्तीचे काम महावितरणला, इतर कामे जिल्हा परिषद वर्धाला देण्यात आली होती. निम्म वर्धा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने हि कामे दर्जेदार व्हावी यासाठी पहीले मजीप्राने पाणीपुरवठाची कामे झाल्यावर डांबरीकरणची कामे करावी याबाबत वेळोवेळी सुचित केले होते. असे झाले देखील परंतु आर्वी तालुक्यातील भादोड भाईपूर पुनर्वसित गाव याला अपवाद ठरले आहे.

Advertisements

या गावात आधी डांबरीकरणची कामे करण्यात आली आणि आता मजीप्राची पाणी पुरवठा यंत्रणेची कामे सुरू आहेत. हि कामे जेसीबीने करण्यात येत आहे. या कामा करीता गावा अंतर्गत असलेल्या रोडच्या साईडला पाईपलाईन टाकण्यासाठी जवळपास एक मीटर खोल नाली करून एचडीपीई पाईप टाकण्यात येत आहे. यामुळे सणासुदीच्या काळात डांबरीकरण रस्ता मातीमय झाला आहे. रस्त्याच्या एकाकडेला हि पाईपलाईन टाकण्यात येत असल्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या घरांना पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी झालेला रस्ता खोदावा लागणार किंवा आडवे बोअर जागोजागी मारावे लागणार. एवढे होऊनही आधी झालेल्या रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होणार.

या बाबतीत निखिल कडू यांनी सांगितले की, मजीप्राला वारंवार सांगुनही रस्त्यांच्या डांबरीकरणची कामे होण्या अगोदरच पाणीपुरवठा योजनेची कामे भादोड भाईपूर पुनर्वसन मध्ये का केले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व मजीप्रा या दोन्ही विभागात तांत्रिक दृष्ट्या सधन असुनही हा हलगर्जीपणा केला गेला असुन इतर पुनर्वसित गावांबाबत भादोड भाईपूर गावासारखी निर्माण केलेली स्थिती इतर कोणत्या गावात ओढावलेली आहे याचा आढावा घेऊन संबंधित विभागाच्या विरूद्ध कठोर आंदोलन करण्यात येईल.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *