Breaking News

Vishwbharat

इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न, पर्यावरणाचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य-डॉ.मंगेश गुलवाडे

इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न पर्यावरणाचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य-डॉ.मंगेश गुलवाडे इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरच्या वतीने 1 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर्स डे च्या निमित्याने सेवा सप्ताह कार्यक्रम साजरा केला जात आहे.त्यातीलच एक उपक्रम वृक्षारोपण हे होय. आज  वरोरानाका  येथील चर्च जवळ वृक्षारोपण करण्यात आले.  त्यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे  यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले …

Read More »

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ

*डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ* पिंपरी, ता. २९ जून – नवीन शैक्षणिक धोरणामुळे शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत आमूलाग्र बदल होतील असा विश्वास विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. धीरेंद्र पाल सिंग यांनी व्यक्त केला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या १२ व्या पदवी प्रदान समारंभात डॉ. सिंग प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. …

Read More »

दालमिया सिमेंट कंपनीत तरूण कामगाराचा मृत्यू. 

दालमिया सिमेंट कंपनीत तरूण कामगाराचा मृत्यू.  कोरपना(ता.प्र.):-        कोरपना तालुक्यातील दालमिया सिमेंट कंपनीत उंचीवर काम करीत असताना एका तरूण कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना २९ जून रोजी घडली.संतोष चव्हाण वय अंदाजे २८)असे मृतकाचे नाव असून हा शिवा कंस्ट्रकशनकडे सुपरवायझर म्हणून कामावर होता.उंचीवर काम करीत असताना खाली पडल्याने याला उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.मात्र त्याची प्राणज्योत मालवली.घटनेची माहिती …

Read More »

नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला “वसंतराव नाईक” यांचं नाव द्या. (गोर बंजारा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमर राठोडांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.)

नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला “वसंतराव नाईक” यांचं नाव द्या. (गोर बंजारा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमर राठोडांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.) कोरपना ता.प्र.:-        आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,कृषी व औद्योगिक क्रांतीचे जनक,नवी मुंबईचे निर्माते, सिडकोचे शिल्पकार तथा हरितक्रांतीचे प्रनेते “वसंतराव नाईक” यांचे कर्तुत्व राज्यासह देशालाही गौरवान्वित करणारे आहे. महाराष्ट्राला सुजलाम,सुफलाम करीत असताना त्यांनी मोठ्या दूरदृष्टीने नवी मुंबईची पायाभरणी व उभारणी केली.तत्कालीन विरोधी पक्षाने …

Read More »

कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – विजय वडेट्टीवार

कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – विजय वडेट्टीवार Ø नागपूर व पुणे  विभागीय आयुक्तांना 28 कोटी 80 लाखांचा निधी Ø  पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने चंद्रपूरसाठी 6.50 कोटी चंद्रपूर, दि. 29 : राज्यामध्ये कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवित आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नागपूर विभागीय आयुक्तांना 13 कोटी  व पुणे विभागीय आयुक्तांना 15 कोटी 80 …

Read More »

नवीन नियमावली…सोमवारपासून चारनंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद! , –  राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश

नवीन नियमावली…सोमवारपासून चारनंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद!    –  राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश –  विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यामध्ये नवे निर्बंध मुंबई, महाराष्ट्र राज्यात कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर राज्य सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले. या निर्णयाचा  उलट परिणाम होईन,  निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली.  तसेच  राज्यात डेल्टा प्लस …

Read More »

ओबीसी आरक्षण घटनादत्त अधिकार, त्यावर गदा येवू देणार नाही, *वरोरा येथील चक्काजाम आंदोलनात हंसराज अहीर यांचा सरकारला इशारा*

ओबीसी आरक्षण घटनादत्त अधिकार, त्यावर गदा येवू देणार नाही, *वरोरा येथील चक्काजाम आंदोलनात हंसराज अहीर यांचा सरकारला इशारा* चंद्रपूर:- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी महाविकास आघाडीचे सरकार आहे. ओबीसींचे राजकीय नेतृत्व उभे होवू द्यायचे नाही त्यांना राजकारणात मोठे होवू द्यायचे नाही असा या सरकारचा उद्देश आहे. ओबीसी आरक्षण हा आबीसीं बांधवांचा घटनादत्त अधिकार आहे त्यावर गदा येवू दिली जाणार नाही. …

Read More »

केंद्र सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसी आरक्षण रद्द  – रामू तिवारी यांचा आरोप, काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारचा निषेध

केंद्र सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसी आरक्षण रद्द  – रामू तिवारी यांचा आरोप, काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारचा निषेध चंद्रपूर, ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यामागे राज्यातील तत्कालीन सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली. मात्र, केंद्र सरकारने ती दिली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे म्हणजे संपूर्ण ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित …

Read More »

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार – आ. सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार    – आ. सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन चंद्रपूर, महाविकास आघाडी सरकारने एका पाठोपाठ एक असे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण, मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण आणि अनुसूचित जातीचे पदोन्नतीतील आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. भाजपा-शिवसेना युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व अनुसूचित जातीचे पदोन्नतीतील आरक्षणही सुरू होते. परंतु, …

Read More »

86 कोरोनामुक्त, 16 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

86 कोरोनामुक्त, 16 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु चंद्रपूर,दि. 26 जून :  गत 24 तासात जिल्ह्यात 86 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 16 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या  16 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी …

Read More »