Breaking News

धार्मिक

महादेवाचे मंदिर बांधायला लागली तब्बल 100 वर्षे 👉कुठे आहे हे मंदिर?वाचा…

तुम्हाला अशा एका मंदिराविषयी आम्ही सांगणार आहोत, जे आश्चर्यापेक्षा कमी नाही. हे मंदिर बांधण्यासाठी 100 वर्षांहून अधिक काळ लागल्याचे सांगितले जाते. हे मंदिर महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एलोरा अर्थात वेरूळच्या लेण्यांमध्ये आहे. वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर म्हणून हे ओळखले जाते. 276 फूट लांब आणि 154 फूट रुंद या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एक खडक कापून हे मंदिर बांधण्यात आले आहे. जर …

Read More »

मंदिरांमध्ये मोबाईलवर बंदी; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश!

  मोबाईल आणि मानव यांचं अतूट नातं तयार झालं आहे. मोबाईलला जरासाही आपल्यापासून इकडे-तिकडे जाऊ द्यायचच नाही, असा आग्रह अनेकांचा असतो. पण, काही काळ का असेना आता मोबाईलपासून दूर व्हावे लागेल. यासंदर्भात काय आहे बातमी… वाचा अनेक मंदिरांमध्ये ‘मोबाईल बंद ठेवा’, ‘शांतता पाळा’, ‘फोटो काढण्यास मनाई’ अशा सूचना लिहिलेल्या पाहायला मिळतात. मंदिर प्रशासनाकडून या सूचना दिल्या जातात. पण, आता थेट …

Read More »

सुख, शांतीसाठी तुळशीशेजारी कोणतं रोपटं ठेवाल…

ज्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे, तिथे सदैव सुखसंपत्ती आणि भरभराट नांदते असं म्हटलं जातं. तुम्हाला माहितीये का? हे रोप असणं जितकं महत्त्वाचं त्याहूनही त्याची काळजी घेतली जाणं त्याहून महत्त्वाचं आहे. आपण, सहसा घरामध्ये खिडकीच्या भागात झाडं ठेवतो. तिथं तुळशीसोबत इतरही काही झाडं आपण ठेवतो. पण, या पवित्र रोपाशेजारी कोणतंही झाड किंवा रोप ठेवून चालत नाही. तुळशीशेजारी कोणतं रोप ठेवू नये? …

Read More »

हनुमान चालिसा पठण करण्याचे नियम वाचा

हनुमानची मनोभावे पूजाविधी केला तर तुमची अनेक संकटे दूर होतात. मात्र, योग्य प्रकारे हनुमान चालिसा पठण केले तर त्याचे खूप फायदे आहेत. हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मंगळवार आणि शनिवार हे हनुमानजींची पूजा करण्याचे दिवस आहेत. या दिवशी हनुमानजींच्या पूजेबरोबरच हनुमान चालिसाचे पठण केल्यास हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्याने तो लवकर प्रसन्न होतो …

Read More »

तीन डोळे, तीन शिंगे असलेल्या नंदी बैलाचे निधन

नंदी बैलाला वैदिक धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक परंपरेनुसार नंदी बैल म्हणजे भगवान शंकराचे प्रमुख वाहन आहे. त्यामुळे लोकांच्या भावना देखील आणखी प्रकट होताना दिसतात. अशातच आता मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्हातील बुंदेलखंडमधील केदारनाथ धाम प्रसिद्ध आहे. जटाशंकर धाम येथील प्रसिद्ध नंदी बैलाचे निधन झाले आहे. तीन शिंगे, तीन डोळे प्रत्येक नंदी बैलाला दोन शिंगं असतात. मात्र, जटाशंकर धाम येथील प्रसिद्ध …

Read More »

“आयुष्याची माती करायची नसेल तर आई-वडिलांना सांभाळा…”

“मुलांसाठी आई-वडिलांचे आशीर्वाद आयुष्याला समृद्ध करतात. आयुष्याची माती करायची नसेल तर आई-वडिलांना सांभाळा,”असे भावनिक आवाहन नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानच्या विश्वस्त कीर्तनकार कांचनताई जगताप यांनी केले. या वेळी विजय औताडे यांनी त्यांच्या आई कै.अनिताताई साईनाथ औताडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भगवानबाबा बालिकाश्रमातील २० मुलींना दत्तक घेतले. हर्सूलचे ग्रामदैवत हरसिद्धी माता यात्रोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात जगताप बोलत होत्या. “जन्माला येणे …

Read More »

कोल्हापुरातील बेलाची पाने जाणार इंग्लंडच्या शिवभक्त पंतप्रधानांसाठी!

बेलाची पाने शंकराला वाहिली जातात. बेलाच्या पानात अर्थात माता पार्वती असते, असे जाणकार सांगतात. कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मातृलिंगावर वाहिलेली बेलाची पाने आता थेट इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांच्याकडे जाणार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या सुधा मूर्ती या जावयाला कार्तिक पौर्णिमेची ही भेट देणार आहेत. अंबाबाईवर अपार श्रद्धा असलेल्या सुधा मूर्ती यांनी सोमवारी अत्यंत साधेपणाने देवीचे दर्शन घेतले. यानंतर …

Read More »

तुळशी विवाहासाठी पूजेची करा तयारी, मातेचा घ्या आशीर्वाद

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात. आणि भगवान शिवाकडून पदभार स्वीकारतात. या दिवशी उपासना आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला केला जातो. पंचांगानुसार यंदा तुळशी विवाह शनिवार,5 नोव्हेंबरला होत आहे. या दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णूचे आराध्य दैवत शालिग्रामशी होतो. शास्त्रानुसार या एकादशीचे …

Read More »

तुळशी विवाहानंतर लग्न योग : जूनपर्यंत ५८ मुहूर्त

कार्तिक एकादशीला दीपावली उत्सवाची सांगता होत असते.५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वादशी असून या दिवसापासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमा अर्थात ८ नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह साजरा करण्याची रुढ परंपरा आहे. ५ नोव्हेंबरला चातुर्मास समाप्ती आणि शनी प्रदोष व शाकव्रत समाप्ती असल्याने या दिवसापासून विवाह सोहळे सुरू होणार आहेत. यावर्षी जवळपास ५८ विवाह मुहूर्त असल्याचे समजते. भारतीय पंचांगानुसार तत्कालीन पर्यावरणीय वर्तमाननुसार पावसाळा …

Read More »

औरंगाबाद : छठ पूजेत गॅसचा स्फोट ; 35 हून अधिक जखमी

  विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद येथे छठ पूजा करताना आज सकाळी गॅसचा स्फोट झाला. स्फोटात दोन मजली इमारतीला आग लागली. भीषण आगीत 35 हून अधिक जण जखमी झाले. तर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारे पोलिसही जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. औरंगाबादमधील (बिहार) शाहपूर परिसरातील हा भीषण स्फोट झाला. घरात अचानक आग लागली. यामुळे छठ …

Read More »