Breaking News

नागपूर

नागपूरजवळ वाघाचा मृत्यू

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील हिंगण्याजवळ सातनवरी भागात वाघाचे शव मिळाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच हिंगणा वनविभागाची टीम घटनास्थळी पोचली. नैसर्गिक मृत्यू असल्याची माहिती आहे. ही घटना महसूलच्या जागेत असल्याचे कळते. याबाबत वनविभागाने तपास सुरु केलाय. मात्र, संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही.

Read More »

दिवाळीपूर्वी छापेमारी : नागपुरात २० लाखांचा भेसळयुक्त अन्नपदार्थ साठा जप्त

विश्व भारत ऑनलाईन : अन्न व औषध प्रशासनाने नागपुरात राबविलेल्या मोहिमेत तब्बल २० लाखांचा अन्नपदार्थांचा भेसळयुक्त साठा जप्त केला. नागपुरात १६ ठिकाणी धाड टाकण्यात आली. यामध्ये १० हजार ८८३ किलो वजनाच्या अन्नपदार्थांचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला. जप्त केलेल्या मालाची किंमत २० लाख १९ हजाराच्या घरात आहे. यात तेलापासून वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा समावेश आहे. दिवाळीच्या काळात अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात …

Read More »

अमरावती-नागपूर-जबलपूर शनिवारपासून धावणार : सणासुदीत १७९ ‘स्पेशल ट्रेन’ची व्यवस्था

विश्व भारत ऑनलाईन : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.जबलपूर-नागपूर-अमरावती ही रेल्वे उद्या शनिवारपासून सुरु होत आहे. तसेच देशभरात सणासुदीचे काळ सुरू आहे. अशावेळी नोकरी, व्यवसायानिमित्त आपले गाव सोडून इतर राज्यात गेलेल्यांना सण साजरा करण्यासाठी सहजरित्या आपल्या घरी जाता यावे, म्हणून रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष सोय केली आहे. रेल्वे विभागाने सणासुदीनिमित्त या वर्षी छठपूजेपर्यंत १७९ पेअर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या …

Read More »

ठाकरेंची सेना खिळखिळी करण्याचा शिंदेंचा प्रयत्न : खासदार कृपाल तुमानेंचा गौप्यस्फोट

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी करत उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचले. शिंदेंनी केलेले बंड हे उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका ठरले.पण, त्यानंतर शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवरच प्रहार केला. आमदारांपाठोपाठ खासदार आणि राज्यभरातले जिल्हाप्रमुख इतर पदाधिकारीही फोडले. त्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एक झटका देणार आहे. शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा गौप्यस्फोट केला. दसऱ्याच्या मुहूर्तावर …

Read More »

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक 17 ऑक्टोबरला

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी सव्वादोन वर्षासाठी 17 ऑक्टोबरला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. यंदा अनुसूचित जमातीसाठी अध्यक्षपद राखीव आहे. भाजपकडे या प्रवर्गातील एकही सदस्य नाही. त्यामुळे पुन्हा काँग्रेसच्या एखादा सदस्याला अध्यक्ष पदाची संधी मिळू शकते, त्यादृष्टीकोनातून अंतर्गत राजकारण सुरु झालेय.

Read More »

कर्मचाऱ्यांसह एसडीएम, तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांविरोधात एकवटले, आजचे बंड रद्द

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सतत अपमान करून कामाचा तगादा लावतात, यासह अनेक तक्रारींचा पाढा महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे वाचला होता. यात जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदारही एकवटले होते. मात्र, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मध्यस्थी करून आज जिल्हाधिकारी यांच्याविरोधात होणारे आंदोलन मागे घेण्यास महत्वाची भूमिका बजावली. बंडाचे कारण? …

Read More »

भाजपमध्ये शिक्षक आमदारकीसाठी नागपुरातून कोणती नावे चर्चेत?

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. कधी काळी नितीन गडकरी यांनी नेतृत्व केलेला पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड होता. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने अभिजित वंजारी यांना उभे करुन भाजपच्या गडावर कब्जा केला होता. आता शिक्षक आमदार निवडणुकीची घंटी वाजली आहे. त्यासाठी सुमारे अर्धा डझन इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपची मोठी डोकेदुखी …

Read More »

भगर खाताय… सावधान! 156 जणांना विषबाधा.. कुठे आला प्रकार उघडकीस… वाचा

  विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर, कन्नड व बीडच्या गेवराई तालुक्यात भगर खाल्ल्याने १५६ जणांना विषबाधा झाली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. वैजापूर तालुक्यात विषबाधा झालेल्यांची संख्या ११८, कन्नडमध्ये १२ तर गेवराई तालुक्यातील २६ जणांवर उपचार सुरू आहेत. वैजापुरात सोमवारी (२६ सप्टेंबर) रात्री ९ ते मंगळवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या गावातून बाधित रुग्णांच्या संख्येत सकाळपर्यंत वाढ झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये महिलांची …

Read More »

सर्वोच्च न्यायालय : नागपूर, औरंगाबाद महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे भवितव्य आज ठरणार

  विश्व भारत ऑनलाईन : मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी(28 सप्टेंबर)सुनावणी होणार आहे. या निवडणुका महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रभाग संख्येबाबत घेतलेल्या निर्णयानुसार होणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयानुसार होणार, यावर या सुनावणीत निर्णय होणे अपेक्षित आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०२१ …

Read More »

औरंगाबाद : मुख्यालयी रहा, अन्यथा कारवाई, वाद वाढणार

  विश्व भारत ऑनलाईन : शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा विषय चांगलाच गाजत आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचा आग्रह केल्यानंतर काही संघटना न्यायालयात गेल्या होत्या. काही काळ थांबलेला मुद्दा आमदार प्रशांत बंब यांच्या मुख्यालयी राहण्याच्या आग्रहाने पुन्हा सुरु झाला आहे. त्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी शासनाच्या मुख्यालयी राहण्याच्या विविध आदेशाचा संदर्भ देत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे …

Read More »