Breaking News

नागपूर

राज ठाकरे आज घेणार चंद्रशेखर बावनकुळेंची भेट; भेटीमागचं कारण?

विश्व भारत ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान राज ठाकरे अनेक नेत्यांच्या तसंच पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. रविवारीच ठाकरे यांची नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत भेट झाली. या दोन्ही बड्या नेत्यांनी नागपुरात फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटेन शो पाहिला. यानंतर आता आज राज ठाकरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचं समोर आलं आहे. …

Read More »

मनपा निवडणुकीच्या कामाला लागा-राज ठाकरे

विश्व भारत ऑनलाईन : महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. आपल्याकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे कामात मागे पडू नका. पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागा, अशाही सुचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. दरम्यान, राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून (दि.१८) जल्लोषात सुरूवात झाली. यावेळी नागपुरात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तेव्हा त्यांनी नागपूरच्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना …

Read More »

नागपुरात राज ठाकरे-नितीन गडकरी भेट

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे नागपुरात फुटाळा तलाव येथे लेझर शो पाहण्याकरिता एकत्र आले आहेत. आजपासून राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात मुंबई येथे भेटीगाठी झाल्या होत्या. त्यानंतर भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची भेट राज ठाकरे …

Read More »

आठ हजार विद्यार्थ्यांचे गडकरींना पत्र, यवतमाळ-अमरावती रस्त्याची दैनावस्था

विश्व भारत ऑनलाईन : रस्ते म्हटलं की, नितीन गडकरी यांचे नाव ओठांवर येतेच. अनेक महामार्ग तयार करणारे गडकरी ‘रोडकरी’म्हणूनही ओळखले जातात. तरीही काही रस्त्यांची डागडुजी अजून झालेली नाही. यवतमाळ-अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये पुढील क्रमांक आपला तर नाही ना? अशी भीती येथील विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासाठीच यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय परिवहन …

Read More »

औरंगाबाद : अधिकाऱ्याचे अपहरण, आरोपी अटकेत

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील इब्राहिमपूर या गावातून शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राज्याच्या उद्योग मंत्रालयातील निवृत्त अधिकारी विश्वनाथ लक्ष्मण राजळे (६०) यांचे 4 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस पथकाने बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारातील एका पेट्रोल पंपावर रात्री ९ वाजेच्या सुमारास राजळे यांची सुटका करून सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. विकास भगवान खरात(२२), पांडुरंग विष्णू …

Read More »

राज ठाकरे रविवारपासून नागपूर, चंद्रपूर, अमरावती दौऱ्यावर

विश्व भारत ऑनलाईन : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे उद्या रविवार 18 सप्टेंबरपासून विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन होणार आहे. विदर्भ एक्सप्रेसने मुंबईहुन रवाना झाले असून, उद्या सकाळी 8.30 वाजता त्यांचे नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकावर आगमन होईल. त्यानंतर रविभवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. 15 वर्षांनंतर विदर्भात ठाकरे हे सुमारे 15 वर्षांनंतर विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2005 मध्ये राज …

Read More »

सुरेश भट यांचे शिष्य व ज्येष्ठ गझलकार निलकांत ढोले यांचे निधन

विश्व भारत ऑनलाईन: ‘अग्निबन’, ‘कळा काळजाच्या’, ‘वेदनांची वेधशाळा’, असे कविता संग्रह लिहिणारे आणि ज्येष्ठ गझलसम्राट सुरेश भट यांचे शिष्य निलकांत ढोले (सेवानिवृत्त शिक्षक) यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. शनिवारी पहाटे नागपुरातील हिंगणा मार्गावरील साईनगर येथे त्यांचे निधन झाले. ‘वेदनांची वेधशाळा’ हा त्यांचा गझलसंग्रह व ‘सोहळे ऋतूंचे’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह वाचकप्रिय ठरले. निलकांत ढोले यांच्या ‘अग्निबन’ ह्या संग्रहाला …

Read More »

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष, सिंचनाची श्वेतपत्रिका काढा-कारेमोरे

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात सर्वाधिक धरणे मराठवाड्यात आहेत. येथे किमान दहा लाख हेक्टर जमिनीचे सिंचन होणे अपेक्षित आहे. मात्र, दाेन ते तीन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येते. फक्त कागदावरच. पाण्याअभावी शेतकरी आत्महत्याग्रस्त ठरलेल्या मराठवाड्याच्या सिंचनप्रश्नावर मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. मराठवाड्यात पाणी स्थिती …

Read More »

शेतकरी चिंतेत : संत्रा बागांवर काळ्या माशीचे संकट

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर तालुक्यातील संत्रा व मोसंबी बागेत सध्यस्थितीत काळया माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. विदर्भातील हवामान या किडीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे बागांचा ऱ्हास होत असल्याची माहीती प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वंडली येथील कीटकनाशक तज्ज्ञ प्रा.प्रवीण दरणे यांनी दिली. माशीमुळे फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. काटोल व नरखेड …

Read More »

नागपूरजवळ दरीत कोसळली बस, 4 गंभीर

विश्व भारत ऑनलाईन : हिंगणी-सेलू मार्गावर आज शुक्रवारी पेंढरी घाटात खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला. बसमध्ये 30 प्रवासी होते. 4 ते 5 जण गभीर जखमी असल्याचे कळते. नागपूर कडून हिंगणी-वर्धाकडे जाणारी ट्रॅव्हल्स 20 फूट खाली दरीत कोसळली. पेंढरी घाटावर असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »