Breaking News

प्रादेशिक

चंद्रपुरात विजेच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूरातील भद्रावती तालुक्यातील माजरी येथे जिवंत विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन वाघिणीचा रविवारी मृत्यू झालाय. रविवार, १५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रेल्वेच्या मुख्य लाईनजवळील सी केबिनच्या मागील भागात वाघिणीचा मृतदेह आढळला. वाघीण मृतावस्थेत दिसताच याबाबत रेल्वे कर्मचाऱ्याने माजरी पोलिसांना माहिती दिली. माजरी येथील देवराव पाटेकर यांच्या शेतात वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण व्हावे,यासाठी जिवंत विद्युत प्रवाहची फेंसिंग करण्यात आली आहे. वाघिणीचा मृतदेह फेंसिंगच्या …

Read More »

जैन कलार समाज निवडणुकीत घोळ : धर्मादाय कोर्टाची प्रक्रियेवर स्थगिती

नागपुरातील जैन कलार समाज न्यासची निवडणूक अलीकडेच पार पडली. किचकट निवडणूक प्रक्रिया, मतमोजणीतील घोळ व निवडणूक अधिका-यांचे नियमबाह्य वर्तन यामुळे धर्मदाय आयुक्तांनी निकाल प्रक्रियेवर स्थगिती दिली आहे. 25 डिसेंबरला जैन कलार समाजाच्या मध्यवर्ती समितीसाठी तसेच जिल्हा समितीसाठी एकूण २६ केंद्रांवर मतदान पार पडले. २६ डिसेंबरला मतमोजणी अपेक्षित होती. मात्र, तसे न होता पाच दिवसांनंतरही संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाल घोषित करण्यात …

Read More »

चंद्रपुरच्या जंगलात थरार : वाघ आणि मादी बिबट्यात झुंज,कोण जिंकले? वाचा…

चंद्रपूर जिल्ह्यातील तळोळी बाळापूर वनपरिक्षेत्रांतर्गतमधील गोविंदपूर वनक्षेत्रातील येनोली माल बिट कक्ष क्रमांक ६५ मध्ये मादी बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाघासोबतच्या झुंजीत मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांचा आहे. माहितीनुसार,तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील येनुली मालचे वनरक्षक श्रीरामे गुरुवारी सकाळी गस्तीवर असताना कक्ष क्रमांक ६५ मध्ये अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाची मादी बिबट मृतावस्थेत आढळली. वाघासोबतच्या झुंजीत …

Read More »

चंद्रपुरात वाघांच्या बंदोबस्तासाठी तहसीलवर मोर्चा

चंद्रपूरच्या मुल तालुक्यातील जंगलव्याप्त गावामध्ये वाघांनी धुकाकूळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांचे जीव वाघाच्या हल्ल्यात गेले आहेत. वनविभाग वाघांच्या बंदोबस्तासाठी अपयशी ठरल्याने वाघांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी, शेतमजूर, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वात बुधवारी सकाळी राज्य शासनाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोघा व्यक्तींनी वाघांची वेशभूषा धारण करून जंगलभागातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी वनविभागाला साकडे घातले. या गावातील नागरिक …

Read More »

लोणारकडे दुर्लक्ष : विभागीय आयुक्त हाजीर हो…!-हायकोर्ट

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन व विकासाबाबत कर्तव्य बजावण्यात उदासिनता दाखवल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावतीच्या विभागीय आयुक्तांना २१ डिसेंबरला न्यायालयात समक्ष हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या लोणार सरोवरात वैज्ञानिकदृष्ट्या संशोधनाला भरपूर वाव असून जगभरातून संशोधक व पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात. या सरोवराच्या जतन, संवर्धन व विकासाबाबत दिरंगाई होत असल्याविषयीची …

Read More »

चंद्रपूर : ताडोबात एक वाघिण,दोन वाघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याच्या बफरझोनमधील शिवनी व मोहरली वनपरिक्षेत्रात एक वाघ व एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बुधवारी एका वाघीणचा मृत्यू झाला होता. वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी गस्त घालत असताना मृतावस्थेत वाघ व बछडा आढळून आले. ताडोबाच्या बफर झोनमधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू सुमारे २०-२५ दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. मृतावस्थेतील वाघ खूप …

Read More »

शिव भोजन थाळीचे बील काढण्यासाठी 80 हजाराची लाच : लाचलूचपतच्या पोलीस निरीक्षकही जाळ्यात

✳️पहिली घटना शिवभोजन थाळीचे थकीत देयक काढण्यासाठी 80 हजाराची लाच घेताना वाशिम येथील पुरवठा निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. निलेश विठ्ठल राठोड असे पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई अमरावती लाचलूचपत विभागाने केली. ✳️दुसरी घटना नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना 60 हजारांची लाच घेताना अटक करण्यात …

Read More »

गडचिरोली : भूकंपाचे धक्के

विश्व भारत ऑनलाईन : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात शुक्रवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील उमानूर ते झिंगानूर परिसरात असून तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू उमानूर आणि झींगानूरमधील टेकडी परिसरात असल्याचा अंदाज आहे. हा परिसर तेलंगणा राज्याला लागून असल्याने तेथेही काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले …

Read More »

817 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 260 मदतीपासून दूर

विश्व भारत ऑनलाईन : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत झालेल्या ८१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ३७९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर २६० प्रकरणे ही अपात्र ठरविण्यात आली आहेत. १७८ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. याच कालावधीत सर्वाधिक २३२ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात २१८, बुलढाणा जिल्ह्यात १८५, अकोल्यात १०१ तर वाशीम जिल्ह्यात ८१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली …

Read More »

शिंदे गटाचा आमदार भाजपच्या कार्यक्रमात, फडणवीस यांची स्तुती

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण, आता शिंदे गटातीलच आमदाराने भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये दाखल होणार का, अशी चर्चा रंगली आहे. भंडाऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे …

Read More »