Breaking News

देश

गडकरींना डावलण्याची मोदींची खेळी!

✍️मोहन कारेमोरे नागपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्ग,मेट्रोसह विविध विकासकामांचे उदघाटन केले. समृद्धी महामार्ग बांधकामात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची महत्वाची भूमिका आहे. तितकीच नितीन गडकरी यांचीही. मात्र, नरेंद्र मोदी यांनी शिंदे आणि फडणवीस यांचे कौतुक केले. त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान दिसले. मात्र, गडकरी यांच्याकडे कानाडोळा केल्याचे दिसते. त्यामुळे येत्या काळात शिंदे आणि फडणवीस यांचे वजन वाढणार आहे. …

Read More »

महाराष्‍ट्र गुजरातला देणार वाघ : बदल्‍यात कोल्‍हा अन् इमू मिळणार

मागील काही महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक नियोजित उद्योग गुजरात राज्यात गेल्याचा आरोप झाला. त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. आता औरंगाबादेतील दोन वाघही गुजरातला जात आहेत. अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाला दोन वाघ देण्याच्या आणि त्यांच्याकडून कोल्हा, इमू यासह इतर काही प्राणी स्वीकारण्याच्या प्रस्तावाला औरंगाबाद महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार येत्या पंधरा दिवसांत प्राण्यांचे हे हस्तांतरण होणार आहे. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात तीनशेहून …

Read More »

मंदिरांमध्ये मोबाईलवर बंदी; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश!

  मोबाईल आणि मानव यांचं अतूट नातं तयार झालं आहे. मोबाईलला जरासाही आपल्यापासून इकडे-तिकडे जाऊ द्यायचच नाही, असा आग्रह अनेकांचा असतो. पण, काही काळ का असेना आता मोबाईलपासून दूर व्हावे लागेल. यासंदर्भात काय आहे बातमी… वाचा अनेक मंदिरांमध्ये ‘मोबाईल बंद ठेवा’, ‘शांतता पाळा’, ‘फोटो काढण्यास मनाई’ अशा सूचना लिहिलेल्या पाहायला मिळतात. मंदिर प्रशासनाकडून या सूचना दिल्या जातात. पण, आता थेट …

Read More »

काँग्रेस मुख्यालयासमोर हिंदू महासभा उभारणार सावरकरांचा पुतळा

अखिल भारतीय हिंदू महासभेने दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतलाय. वीर सावरकरांवर आक्षेपार्ह मत नोंदवल्याने महासभेने कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली आहे. यासंबंधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वातंत्र्यसेनानींचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांच्या सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्याची माग‍णी केलीय. कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी सातत्याने वीर सावरकरांबद्दल अपमानजनक शब्दांचा वापर करतात. राहुल …

Read More »

’27 इंच’ उंचीच्या अजीमचे ठरले लग्न

लग्न करून सुखी संसार असावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते. तरीही, काही ना काही कारणास्तव अनेकांना लग्नासाठी योग्य जोडीदार न मिळण्याची उदाहरणं कित्येक आहेत.उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील अजीम मंसूरी यांनाही उंचीमुळे लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. अजीमची उंची फक्त 27 इंच म्हणजे 2.3 फूट इतकी आहे. त्याने आपल्या लग्नासाठी राजकीय नेत्यांचीही भेट घेतली होती. अखेर अजीमला मुलगी मिळाली असून नोव्हेंबरमध्ये त्यांचे लग्न …

Read More »

नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ निर्माण करा, हिंदू महासभेचे प्रचारक कारेमोरे यांचे राष्ट्रपतींना पत्र

विश्व भारत ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालय देशासाठी एकच आहे. सर्वोच्च न्यायालयात दूरच्या भागातील लोकांना दिल्लीला जाणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. हीच बाब लक्षात घेऊन अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ निर्माण करण्याची विनंती केली आहे. तसेच अलीकडेच संसदेच्या स्थायी समितीने नुकताच जो १०७ वा अहवाल सादर केलेला आहे, त्यामध्ये कोलकाता, मुंबई …

Read More »

नोटेवर गांधीजींचा फोटो नको ; हिंदू महासभा प्रचारक मोहन कारेमोरे यांची मागणी

विश्व भारत ऑनलाईन : अखिल भारतीय हिंदू महासभेने सर्व चलनी नोटावरून महात्मा गांधीजीं ऐवजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो लावावा, अशी मागणी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाला दिलेले योगदान राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या कार्याशी तुलना करता कमी नाही, असेही या संघटनेने म्हटले आहे. याला अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनीही दुजोरा दिला आहे. सुभाषचंद्र बोस …

Read More »

राहुल गांधी 382 किमी चालणार : महाराष्ट्रात 7 नोव्हेंबरपासून भारत जोडो यात्रा

विश्व भारत ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधीची भारत जोडो पदयात्रा सात नोव्हेंबर रोजी तेलंगणातून महाराष्ट्रात येत आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत ते नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलडाण्यात 382 किलोमीटर चालतील. त्यापैकी 208 किमी नांदेड, हिंगोली जिल्ह्यात चालणार आहेत. गांधी सात नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूरला मुक्कामी असतील. 8 तारखेला पदयात्रा सुरू होईल. दुपारी ते अटकळी गावात भोजन करून शंकरनगरला मुक्काम करतील. 9 …

Read More »

काँग्रेस अध्यक्ष : खर्गे की थरूर? आज निर्णय

विश्व भारत ऑनलाईन : काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण विजयी होणार,याचा निर्णय बुधवारी होणार आहे. मतमोजणीसाठी पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरण सज्ज झाले आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पारडे जड असून त्यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत सोमवारी 96 टक्के मतदान झाले होते. खर्गे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदासाठी सरळ लढत होत आहे. याकडे साऱ्या …

Read More »

गाईला राष्‍ट्रीय प्राणी घोषित करण्‍याची विनंती करणारी याचिका फेटा‍‍‍ळली

विश्व भारत ऑनलाईन : गाईला केंद्र सरकारने राष्‍ट्रीय प्राणी घोषित करावे, अशी मागणी करणारी याचिका आज सोमवारी सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली. यावेळी खंडपीठाने गाईला राष्‍ट्रीय प्राणी घोषित करावे यासाठी निर्देश देण्‍याचे हे काम न्‍यायालयाचे आहे का? जिथे आम्हाला वेळ खर्च करावा लागतो. तुमच्‍या कोणत्‍या मूलभूत अधिकारांवर परिणाम झाला आहे, तुम्‍ही कशासाठी न्‍यायालयात आला आहात? असे सवाल करित यावेळी खंडपीठाने याचिकाकर्त्या गोवंश …

Read More »