विश्व भारत ऑनलाईन : आफ्रिकन देश नामिबियातून आज शनिवारी आठ विदेशी चित्ते तब्बल 70 वर्षांनंतर भारतात पोहोचले आहेत. एक विशेष विमान मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये दाखल झाले. येथून हेलिकॉप्टरद्वारे चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे. परदेशी चित्ते श्योपूरला पोहोचले नामिबियाचे चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथे पोहोचले आहेत. हेलिकॉप्टर चित्तांसह ग्वाल्हेरहून श्योपूरला पोहोचले आहे. काही वेळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना …
Read More »रेल्वे तिकीट बुकिंग आता आणखीण सोप्पे
विश्व भारत ऑनलाईन : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला ट्रेनचं तिकीट आणखीण सोप्प्या पद्धतीत बुक करता येणार आहे. त्यामुळे करोडो प्रवाशांसाठी ही दिलासादायक बाब असणार आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. या सुविधा आणखी सुलभ होण्यासाठी रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असते. आता अशीच एक सुविधा रेल्वे घेऊन आली आहे. या सेवेमुळे आता तुम्हाला …
Read More »कॅन्सरवरील औषधे होणार स्वस्त
विश्व भारत ऑनलाईन : सर्वांना परवडणाऱ्या ३८४ आवश्यक औषधांची यादी तब्बल सात वर्षांनंतर मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केली. या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे अनेक अँटिबायोटिक्स, कॅन्सर प्रतिबंधक औषधे आणि लशी स्वस्त होतील. ३८४ आवश्यक औषधांच्या नव्या राष्ट्रीय यादीत अंतर्स्रावी, हृदय आणि रक्तनलिकांच्या देखभालीसाठीच्या तसेच गर्भनिरोधक, श्वसन आणि नेत्ररोगाशी संबंधित औषधांचा समावेश करण्यात आला आहे. ‘सर्वांना औषध, …
Read More »आज सर्वोच्च न्यायालयात २०० जनहित याचिकांवर सुनावणी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज, सोमवारी (दिनांक 12) तब्बल २०० हून अधिक जनहित याचिकांवर सुनावणी घेण्यात येईल.नागरिकत्व कायद्यासह (सीएए) अन्य काही महत्त्वाच्या याचिकांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सोमवारच्या कामकाज यादीत जनहित याचिकांचा समावेश आहे. सरन्यायाधीश उदय लळित यांच्या खंडपीठासमोर ‘सीएए’वरील याचिकांची एकत्रित सुनावणी होणार आहे. २०१९मध्ये न्यायालयाने सीएएअंतर्गत कार्यवाही थांबवण्यास नकार देत केंद्र सरकारला नोटीस बजावली होती. गेल्या …
Read More »चित्ता येणार भारतात, वन्यजीव प्रेमीत उत्सुकता
विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ व पश्विम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात चित्ता होता अशी नोंद आहे. विदर्भातील शिकाऱ्यांनी चित्याच्या शिकारी केल्याच्याही नोंदी आहेत. आता हाच चित्ता भारतातील मध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात 17 सप्टेंबर रोजी नामीबिया येथून पोहचणार आहे. भारत सरकारने भारतात पुन्हा चित्ता आणून त्याचे संवर्धन करण्यासाठी ‘चित्ता री-इंट्रोडक्शन’ हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. …
Read More »पोसणाऱ्यांनीच कुत्र्यांचे लसीकरण करावे
विश्व भारत ऑनलाईन : रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांना अन्नपाणी, खाद्यपदार्थ, बिस्कीट देणाऱ्यांनी या कुत्र्यांचे लसीकरण करावे, तसेच या कुत्र्यांनी कुणावर हल्ला करून जखमी केल्यास उपचाराच्या खर्चाची जबाबदारीही पशुप्रेमींवर टाकली जाऊ शकते, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. रस्त्यांवरील मोकाट कुत्र्यांशी संबंधित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली त्या वेळी नागरिकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे हक्क यामध्ये संतुलन राखले गेले पाहिजे, असे मत न्यायालयाने व्यक्त …
Read More »तावडेंकडे बिहार,जावडेकरांकडे केरळचा अवघड पेपर, मुंडेकडेही जबाबदारी
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील प्रभारींच्या नावांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, विजया राहटकर यांच्याकडे महत्वाच्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली. तर,पंकजा मुंडे यांच्याकडील जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची बिहारचे प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी …
Read More »केदारनाथ धामचे ११ लाख भक्तांनी घेतले दर्शन
केदारनाथ : जगप्रसिद्ध केदारनाथ यात्रेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच भाविकांच्या गर्दीने सर्व जुने विक्रम मोडले आहेत.यंदा यात्रा काळात प्रथमच १२६ दिवसांत तब्बल ११ लाख भाविकांनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले आहे. २०१९ मध्ये सहा महिन्यांत १० लाख यात्रेकरू केदारनाथ धामला पोहोचले होते, मात्र यावेळी यात्रेने सर्व जुने विक्रम मोडले आहेत. अजून दीड महिन्याचा यात्रा कालावधी आहे. अशा परिस्थितीत केदारनाथला येणाऱ्या भाविकांचा आकडा …
Read More »‘लम्पी’चे थैमान,75 हजार गायी दगावल्या
मोहन कारेमोरे नागपूर : लम्पी या रोगाचा देशात १५ राज्यांमधील १७५ जिल्ह्यांत प्रादुर्भाव झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक गायी तसेच जनावरांना याची लागण झाली असून आतापर्यंत ७५ हजार गायी दगावल्या आहेत. प्रत्यक्षात याचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र देशात ५७ हजार गायी मृत्युमुखी पडल्याचे केंद्र सरकारने सांगितले. राज्यात लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाने मृत झालेल्या जनावरांसाठी शेतकरी, …
Read More »पेट्रोल,डिझेलचे दर होणार कमी?
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 3 रुपयांनी कमी होऊ शकतात. केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून मोठा दिलासा दिला होता. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी तर डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तेव्हापासून आजतागायत पेट्रोलच्या दरात कोणतीही कपात …
Read More »
विश्वभारत News Website