विश्व भारत ऑनलाईन : उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करण्यात येणार आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. जलयुक्त शिवारच्या ज्या कामांमध्ये गडबड नाही व केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या,त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार आहे. पण, जेथे चुकीचे झाले तिथली चौकशी सुरू राहील, असे फडणवीस …
Read More »राज ठाकरे रविवारपासून नागपूर, चंद्रपूर, अमरावती दौऱ्यावर
विश्व भारत ऑनलाईन : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे उद्या रविवार 18 सप्टेंबरपासून विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन होणार आहे. विदर्भ एक्सप्रेसने मुंबईहुन रवाना झाले असून, उद्या सकाळी 8.30 वाजता त्यांचे नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकावर आगमन होईल. त्यानंतर रविभवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. 15 वर्षांनंतर विदर्भात ठाकरे हे सुमारे 15 वर्षांनंतर विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2005 मध्ये राज …
Read More »बिबट सफारी रद्द,अजित पवारांना धक्का…वाचा
विश्व भारत ऑनलाईन : बारामतीमधील प्रस्तावित असलेली बिबट सफारी अखेर शिंदे सरकारने रद्द केली आहे. ही बिबट सफारी आता जुन्नरला होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामुळे विरोधी पक्षनेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणे दोघेही खुश झाले आहेत. नेमके प्रकरण काय? …
Read More »महाराष्ट्राचा चौफेर विकास करणार-फडणवीस
विश्वभारत ऑनलाईन : महाराष्ट्रातील नियोजित फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. यामूळे महाराष्ट्रामधील मोठा रोजगार गेला, ही सरकारची खेळी आहे, यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे शुक्रवारी (दि.16) विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात राज्याला मागे टाकले आहे, आम्ही आता दोन वर्षांत पुढे नेवू,असे फडणवीस म्हणाले. आता रोजगार वाढणार पुढील काळात …
Read More »फडणवीस उत्कृष्टच,झापाझापीवर सत्तारांनी सोडले मौन
विश्व भारत ऑनलाईन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कोणत्याही प्रकारे खडाजंगी झालेली नाही. कोणतीही योजना प्रसारमाध्यमामध्ये उघड करू नका, असे हसतहसत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलले,असे म्हणत सत्तारांनी झापाझापी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले, त्यादिवशी काय झाले होते. याबाबत अब्दुल सत्तार यांनी सविस्तर सांगितले. ते म्हणाले, खडाजंगी झाली नाही. असेच हसता-हसता मला उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »एकनाथ खडसे राष्ट्रवादीतही नाराज… वाचा नक्की काय
विश्व भारत ऑनलाईन : भाजपमध्ये पक्ष नेतृत्वाविरोधात आवाज उठविल्याने एकनाथ खडसे यांची कोंडी झाली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही तीच परिस्थिती एकनाथ खडसे यांच्यासमोर येऊ शकते. निमित्त होते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा जळगाव दौरा. एका कार्यक्रमात अजित पवारांसमोरच जिल्ह्यातील पक्षाच्या धोरणावर खडसे यांनी नाराजी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते घरीच असतात, पण कार्यक्रमांना बोलावलं जात नाही, अशी खंत …
Read More »शिंदे-फडणवीसांनी मंत्री सत्तारला सुनावले… कारण? वाचा सविस्तर…
विश्व भारत ऑनलाईन : पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही अशाच योजनेचा विचार सुरु असल्याचे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार बोलले होते. मात्र,अजून निर्णय झालेला नसताना प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीसाठी माहिती दिल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना खडेबोल सुनावले. त्यामुळे प्रसिद्धीलोलुप मंत्र्यांची चांगलीच कोंडी झाली. नवे सरकार सत्तेवर आल्यापासून काही मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी दररोज नवनवीन घोषणांचा …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबादेत, पैठणला सभा
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज दुपारी साडेबारा दरम्यान ते शहरात दाखल होतील. त्यानंतर ते मंत्री संदीपान भुमरे यांचे मतदारसंघ पैठणमध्ये सभा घेतील. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. असा कार्यक्रम दुपारी 12 दरम्यान शिंदे हे …
Read More »निवडणूक,अतिवृष्टीवर आज मंत्रिमंडळ बैठक
मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नाही. आज सकाळच्या सत्रात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर, जमिनीला भेगा पडणे, …
Read More »तावडेंकडे बिहार,जावडेकरांकडे केरळचा अवघड पेपर, मुंडेकडेही जबाबदारी
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील प्रभारींच्या नावांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, विजया राहटकर यांच्याकडे महत्वाच्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली. तर,पंकजा मुंडे यांच्याकडील जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची बिहारचे प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी …
Read More »
विश्वभारत News Website