Breaking News

विश्व भारत

पतीला लागली कोटीची लॉटरी ; बायको पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार

‘किस्मत अगर खराब हो तो ऊंट पर बैठे इंसान को भी कुत्ता काट लेता है’, अशी एक हिंदीत म्हण आहे. याचाच प्रत्यय एका घटनेतून आलाय. एका गरीब व्यक्तीला १ कोटी रुपयांची लॉटरी लागली. अचानक इतके पैसे जवळ आल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता या पैशांनी आपण चांगले आयुष्य जगू असा विचार त्याने केला. मात्र, त्याच्या या आनंदावर काही दिवसातच …

Read More »

नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग : 6 विद्यार्थ्यांवर कारवाई

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात (मेडिकल)सिनियरकडून ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रॅगिंग प्रकरणी सहा सिनियर वैद्यकीय विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, हा रॅगिंग झालेला ज्युनियर विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्षाचा आहे. तर रॅगिंग घेतल्याचा आरोप असलेले सहा विद्यार्थी एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर इंटर्नशीप करणारे सिनियर्स आहेत. काही दिवसांपूर्वी सदर रॅगिंगचे प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने त्याची तक्रार …

Read More »

कॅन्सर होऊ नये, यासाठी काय कराल…

कर्करोग हा शब्द जरी काढला तरी धडकी भरते. कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. जे अनेक कारणांमुळे असू शकते. यापैकी काहींवर आपले नियंत्रण नसते, परंतु अनेक कर्करोगांमागे आपल्या काही सवयी आणि जीवनशैली पूर्णपणे जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. आजच्या काळात, लोक त्यांच्या करिअरच्या प्रगतीसाठी अधिक परिश्रम घेतात. तर ते त्यासाठी तडजोडही करण्यास मागेपुढे बघत नाही. बदलेल्या जीवनशैलीनुसार व …

Read More »

तुमचा जोडीदार विवाहबाह्य संबंधात अडकला तर नाही ना? यावरून लागेल पत्ता

लग्न करताना नवरा-बायको एकमेकांवर खूप प्रेम करण्याची आणि एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतात. त्यासाठी तसा प्रयत्न देखील करतात. पण असं असलं तरी देखील बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे लोक लग्न झालं असलं तरी देखील दुसऱ्या पर्यायांकडे वळतात. म्हणजेच दुसरा जोडीदार शोधतात किंवा नकळत त्याच्या प्रेमात पडतात. बहुतेक लोकांच्या मनात अनेकदा नसलं तरी देखील असे काही प्रसंग उद्भवतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल …

Read More »

नियमित बिल भरणार्‍या शेतकर्‍यांनाही फटका : विद्युत रोहित्र बंद करून वसुली!

महावितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी सरसकट रोहित्र बंद करण्याचा धडाका लावला आहे. मात्र, त्यांच्या या अनागोंदी कारभाराचा फटका नियमित बिल भरणार्‍या शेतकर्‍यांनाही बसत आहे. ज्यांच्याकडे थकबाकी आहे, त्यांचे वैयक्तिक कनेक्शन कट करून वसुली केली गेली पाहिजे. मात्र, वर्षभर कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महावितरण कंपनीही अर्थिक अडचणीत येत आहे. यावर्षी शेतकर्‍यांच्या खरीप पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. महावितरण कंपनीही वसुलीअभावी …

Read More »

जीवन क्षणभंगूर : कार चालवत असतानाच हृदयविकाराचा झटका

स्वतःच्या चारचाकी वाहनाने एकटेच बुलढाणा, जळगाव जामोदकडे निघाले असता वाटेतच हृदयघातरुपी काळाने ‘त्यांना’ गाठले.दुखणे असह्य असतानाही त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे नातेवाईकांना ही बाब कळविली. मात्र, कुणीही मदतीला येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. जीवन किती क्षणभंगुर आहे आणि मृत्यू एखाद्याला कसा खिंडीत गाठतो, याचे हे हृदयद्रावक उदाहरण. सोमवारी सकाळी स्थानिक महात्मा फुले शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मानकर (६५) आपल्या मोटारीने जळगाव जामोदकडे जात होते. …

Read More »

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र वेळेत न देणाऱ्या अधिकाऱ्याला पाच हजारांपर्यंत दंड

पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ लागू करण्यात आला आहे. आता लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश केला आहे. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत देण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याला ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘बार्टी’चे महाव्यवस्थापक धम्मज्योती गजभिये …

Read More »

शिव भोजन थाळीचे बील काढण्यासाठी 80 हजाराची लाच : लाचलूचपतच्या पोलीस निरीक्षकही जाळ्यात

✳️पहिली घटना शिवभोजन थाळीचे थकीत देयक काढण्यासाठी 80 हजाराची लाच घेताना वाशिम येथील पुरवठा निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. निलेश विठ्ठल राठोड असे पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई अमरावती लाचलूचपत विभागाने केली. ✳️दुसरी घटना नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना 60 हजारांची लाच घेताना अटक करण्यात …

Read More »

सुख, शांतीसाठी तुळशीशेजारी कोणतं रोपटं ठेवाल…

ज्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे, तिथे सदैव सुखसंपत्ती आणि भरभराट नांदते असं म्हटलं जातं. तुम्हाला माहितीये का? हे रोप असणं जितकं महत्त्वाचं त्याहूनही त्याची काळजी घेतली जाणं त्याहून महत्त्वाचं आहे. आपण, सहसा घरामध्ये खिडकीच्या भागात झाडं ठेवतो. तिथं तुळशीसोबत इतरही काही झाडं आपण ठेवतो. पण, या पवित्र रोपाशेजारी कोणतंही झाड किंवा रोप ठेवून चालत नाही. तुळशीशेजारी कोणतं रोप ठेवू नये? …

Read More »

42 लाखांच्या लाचप्रकरणी तहसीलदार, तलाठ्यासह पाच जणांवर गुन्हा

ट्रस्टच्या जागेचे अकृषक प्रमाणपत्र (एनए) मंजुरीसाठी तलाठ्याने स्वतःसाठी व वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी तब्बल 42 लाखांच्या लाचेची मागणी केली, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत शिरूरच्या तत्कालीन तहसीलदार रंजना उमरहांडे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणावर गुन्हे दाखल? तत्कालीन तहसीलदार उमरहांडे यांच्यासह शिरूर महसूल सहायक कार्यालयातील तहसीलदार स्वाती सुभाष शिंदे, शिरूरचा तहसीलदार सरफराज …

Read More »