Breaking News

विश्व भारत

आठवण : विक्रम गोखलेंनी केले अडीच कोटीचं भूखंड दान

सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले.त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी सह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे विक्रम गोखले उत्तम नट तर होतेच …

Read More »

गुवाहाटी दौरा का नाही? सत्तार म्हणाले, रश्मी ठाकरेंना करा मुख्यमंत्री

उद्धव ठाकरेंकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी कोणतीही कामे केली नाहीत. किमान त्या खुर्ची वर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करा, असा प्रस्तावही मी ठेवला होता. कारण अडीच वर्षात काळात उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले दिसले. मी मंत्री असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय …

Read More »

पुण्याजवळ महाराष्ट्र एक्सप्रेसवर दगडफेक

गोंदियाहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसवर पुणेनजीक उरुळी कांचन येथे दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेत रेल्वेच्या एका डब्याच्या खिडकीची काच फुटली आहे. काचा बंद असल्यामुळे सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस 11040 गोंदियाहून सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुणे विभागात येते आणि त्यानंतर कोल्हापूरपर्यंत धावते. शुक्रवारी सायंकाळी ही गाडी पुणे विभागात दाखल झाली. उरुळी स्थानक परिसर …

Read More »

अमिताभसोबत काम केलेल्या अभिनेत्याला नागपुरातून अटक

नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या नागपुरातील प्रियांशू रवी क्षत्रिय या कलाकाराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर चोरी आणि घरफोडीचा आरोप आहे. प्रियांशूनं झुंड सिनेमात बाबू ही भूमिका केली होती. ती चांगलीच गाजली होती. नागपूरचे क्रीडा शिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित ‘झुंड’ हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. नागराज मंजुळे यांनी या सिनेमाचं …

Read More »

नागपूर : 872 ट्रक रेतीची चोरी; तहसीलदार रडारवर

जीपीएससारखी अत्याधुनिक यंत्रणा तैनात असतानाही नागपूर जिल्ह्यातील रेतीघाटांवरून तब्बल 872 ट्रक रेतीची चोरी झाली आहे, अशी धक्कादायक माहिती एसआयटीच्या तपासात समोर आली आहे. रेतीचोरी थांबविण्यासाठी प्रशासन अनेक प्रकारचे प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून घाटांवर जीपीएस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या कामाचे कंत्राट शौर्या इन्फोटेक या कंपनीला देण्यात आले आहे.रेतीची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक ट्रकची माहिती ते गोळा करतात …

Read More »

मुख्यमंत्री पदाची डोक्यात हवा गेली नाही, सरकार पाडून दाखवा…

हिंमत असेल तर उद्धव ठाकरेनी सरकार पाडून दाखवावे, आमच्याकडे १७० आमदारांचं बहुमत आहे. माझ्या डोक्यात आजही मुख्यमंत्रीपदाची हवा गेलेली नाही. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. एवढंच नाही तर हाताच्या रेषा दाखवायची आम्हाला गरज नाही, मनगटात ताकद आहे ती दाखवायची ताकद आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. आम्ही मंदिरात जायला …

Read More »

जेवताना टीव्ही पाहत असाल तर सावधान! लठ्ठपणाचा धोका

जेवताना टीव्ही पाहत असाल तर सावधान… तुमचे वजन वाढू शकते. सकाळच्यावेळी नाष्टा करताना टीव्ही अजिबात पाहू नये. खातांना टीव्ही पाहण्याने तुमचे लक्ष टीव्हीवरच राहते. त्यामुळे तुम्ही किती खात आहात यावर नियंत्रण राहत नाही. यामुळे तुमचे वजन वाढू शकते. असं म्हणतात की, जर सकाळची सुरुवात चांगली असेल तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसाची चांगली सुरूवात झाल्याने आरोग्य तंदुरुस्त आणि चपळ …

Read More »

हनुमान चालिसा पठण करण्याचे नियम वाचा

हनुमानची मनोभावे पूजाविधी केला तर तुमची अनेक संकटे दूर होतात. मात्र, योग्य प्रकारे हनुमान चालिसा पठण केले तर त्याचे खूप फायदे आहेत. हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मंगळवार आणि शनिवार हे हनुमानजींची पूजा करण्याचे दिवस आहेत. या दिवशी हनुमानजींच्या पूजेबरोबरच हनुमान चालिसाचे पठण केल्यास हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्याने तो लवकर प्रसन्न होतो …

Read More »

गरम पाण्यात पडून चिमुकलीचा मृत्यू : औरंगाबादतील घटना

औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील वाळूज परिसरात ही घटना आहे. घटनेनंतर चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. श्रेया असं मृत लहानगीचं नाव आहे. माहितीनुसार, श्रेया जेवन झाल्यानंतर हात धुण्यासाठी गेली. मात्र तेथे पाय घसरुन ती खाली पडली. त्याठिकाणी बादलीत हीटरच्या साह्याने पाणी केलं होतं. हीटरने गरम झालेल्या पाणी अंगावर …

Read More »

धक्कादायक : ६५ वर्षीय महिलेला बिबट्याने १०० फूट फरफटत नेले

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे परिसरात खडके वस्तीवरील ६५ वर्षीय महिलेला बिबट्याने १०० फूट फरफटत नेऊन फडशा पाडल्याची घटना घडली.तालुक्यात बिबट्याने दुसरा बळी घेतला असून नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. घटना कशी घडली? खडके वस्तीवर रखमाबाई तुकाराम खडके ( वय ६५ वर्षे) या राहत असुन काल रात्री त्या सपराच्या घरात झोपल्या होत्या. मध्यरात्रीनंतर बिबट्याने घरात प्रवेश करुन त्यांच्यावर हल्ला केला. …

Read More »