चवताळलेल्या रानटी हत्तीने तरुणांचा पाठलाग केल्याची घटना नागपूरजवळ उघडकीस आली आहे. या घटनने तरुणांची चांगलीच तारांबळ उडाली असून, त्यांनी गावाच्या दिशेने पळ काढला. ग्रामस्थांनी हत्तींच्या कळपाच्या जवळ जावू नये, असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे. रविवार 27 नोव्हेंबरपासून 23 रानटी हत्तींचा कळप भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील बरडकिन्ही गावालगतच्या जंगलात थांबला होता. शुक्रवारी पहाटे हा कळप शिवणी मोगरा गावाकडून पेंढरीकडे एका शेतातून …
Read More »कमेंट्री करताना दिग्गज क्रिकेटरला हार्ट अटॅक : रुग्णालयात दाखल
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यावेळी रिकी पाँटिंग कमेंट्री करत होते. मात्र अचानक छातीत दुखायला लागल्यानतंर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पाँटिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. रिकी पाँटिंग चॅनेल ७ साठी कमेंट्री करतात. …
Read More »राज्यात 4,122 तलाठ्यांची भरती होणार : एप्रिल-मे मध्ये नियुक्ती
राज्यातील तलाठी पदाच्या चार हजार 122 पदांची भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त एक हजार 12 आणि नव्याने निर्माण केलेल्या तीन हजार 110 या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी …
Read More »थंडीमध्ये गुळ खायलाच पाहिजे… मिळतील अनेक फायदे
थंडीत अनेक लोकं आजाराने त्रस्त होतात. हिवाळ्यात थोडसाही निष्काळजीपणा आजारांना कारणीभूत ठरू शकतो. या ऋतूमध्ये आपण खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. हिवाळ्यात शरीराचे तापमान सामान्य ठेवणे आवश्यक असते. शरीराचे तापमान कमी झाल्यास अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. यासाठी हिवाळ्यात गरम पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. गरम पदार्थांमध्ये गूळ हे अतिशय आरोग्यदायी अन्न आहे. ✳️अॅसिडिटी दूर गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त …
Read More »चंद्रपूर : ताडोबात एक वाघिण,दोन वाघांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याच्या बफरझोनमधील शिवनी व मोहरली वनपरिक्षेत्रात एक वाघ व एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बुधवारी एका वाघीणचा मृत्यू झाला होता. वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी गस्त घालत असताना मृतावस्थेत वाघ व बछडा आढळून आले. ताडोबाच्या बफर झोनमधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू सुमारे २०-२५ दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. मृतावस्थेतील वाघ खूप …
Read More »महागडा घटस्फोट : महिन्याला खावटीचे 1 कोटी 65 लाख द्यावे लागणार
हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांचा अखेर घटस्फोट झालाय. किमने २०२१ मध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता यावर कोर्टाने निकाल दिला असून दोघेही कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. दोघांनाही त्यांच्या मुलांची जॉइंट कस्टडी मिळाली आहे. याबरोबरच कोर्टाने घटस्फोटात किमला कान्ये वेस्ट किती रक्कम देईल, याबद्दल आदेशही दिले आहेत. किमने मार्च २०२२ मध्ये आपण सिंगल असल्याचं जाहीर …
Read More »औरंगाबाद : १२८ लाचखोर ताब्यात ; महसूल विभाग आघाडीवर
यंदा लाचलुचपत विभागाने लावलेल्या १०५ सापळ्यांत ११ महिन्यांत १४० लाचखोर अधिकारी- कर्मचारी तसेच खासगी व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक सापळे पुणे विभागाने यशस्वी केले असून १४३ प्रकरणात २०२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर नाशिक विभागाने ११५ प्रकरणांमध्ये तब्बल १७२ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे. लाचखोरांविरोधात यशस्वी सापळे रचून आरोपी ताब्यात घेण्याच्या कारवाईत विभागाचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो.राज्यात …
Read More »वाळूची अवैध वाहतूक रोखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला ट्रकसोबत फरफटत नेले
वाळूची अवैध वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकातील सहायक पोलिस निरीक्षक योगेश इंगळे यांना वाळू तस्कराने ट्रकसोबत फरफटत घेऊन जात जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना अर्जुननगर ते पीडीएमसी दरम्यानच्या मार्गावर बुधवारी सकाळी ७.३५ वाजेच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी एपीआय योगेश इंगळे यांच्या तक्रारीवरून शोएब अहमद एजाज (रा. आझादनगर), रेहान शेख गुलाब शेख (रा. सबा नगर) व …
Read More »अश्लिल चित्रफीत बनवून अधिकाऱ्याकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी
एका अधिकाऱ्याची अश्लिल चित्रफीत तयार करून ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीचा चंद्रपूरात स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. मंगळवारी रोख ३० हजार व ५ लाखाचा चेक घेताना त्यांना अटक करण्यात आल्याने चंद्रपूरात खळबळ उडाली आहे. यामध्ये सादीक खॉन, झिबल भारसाखरे यांच्यासह तीन महिला आरोपींचा समावेश आहे. मंगळवारी चंद्रपूर शहरातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रारीद्वारे, काही इसमांनी संगणमत करून त्यांना …
Read More »आजपासून थंडीचा कडाका जाणवणार
थंडीचा प्रभाव वाढत आहे. हिमालयीन भागात एक डिसेंबरपासून पश्चिमी चक्रावात पूर्णपणे सक्रिय होणार आहे. परिणामी राज्याच्या सर्वच भागात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार आहे. दरम्यान बुधवारी राज्यात थंडीचे प्रमाण वाढले असून, किमान तापमानाचा पारा सरासरीच्या 3.3 अंश कमी झाला आहे. हवामान विभागानुसार, 2 आणि 3 डिसेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार …
Read More »
विश्वभारत News Website