ऋतू कोणताही का असो,तेलाने मालिश करणे चांगलेच. पण, थंडीचा ऋतू असेल तर त्याचे महत्त्व आणखी वाढते. तेलाने शरीराला मसाज केल्याने हाडे तर मजबूत होतातच, पण आपले स्नायूही चांगले राहतात. भारतातील तेल मसाजची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. आयुर्वेदातही शरीरावर तेल मालिश करण्याच्या अनेक पद्धती आणि फायदे सांगितले आहेत. तेलाच्या मसाजमुळे त्वचेवर चमक येते आणि मृत पेशी बाहेर पडून नवीन पेशी तयार …
Read More »ग्रामसेवक, सरपंचाला कार्यालयात कोंडले : प्रकरण अवैध धंद्याचं
चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथे ग्रामस्थांसह महिलांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. अनेक दिवसांपासून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करूनही कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा संपल्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांना कोंडून कार्यालयाला कुलूप ठोकले. जामदात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनकडून होत आहे. गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करीत होते. …
Read More »महाराष्ट्राच्या राज्यपालांना पदावरून हटवा : मुंबई हायकोर्टात याचिका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपालांवर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता महाराष्ट्रच्या राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा, राज्यपालांनी अवमान केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. कोणी केली याचिका? याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या वतीने वकील …
Read More »५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित : सरपंचपदाचे आरक्षण चुकले
सरपंच पदाच्या आरक्षणपदाची प्रक्रिया चुकीची केल्याने भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील तब्बल ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. चौकशी करुन दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रकरण काय? राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणूक कार्यक्रमान्वये मोहाडी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींपैकी ५८ ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदाच्या निवडणुका जाहीर …
Read More »शेतकरी चिंतेत : संत्र्याचे भाव गडगडले : कारण काय… वाचा
बांगलादेशने शुल्कात वाढ केल्याने विदर्भातील एकूण संत्री उत्पादनाच्या ३५ टक्के माल आयात करणाऱ्या निर्यातीला फटका बसला आहे. त्यामुळे यंदा संत्र्याचे भाव गडगडले आहेत. अतिवृष्टीतून वाचलेल्या संत्री बागा फळांनी लगडल्या असल्या तरी निर्यात घटल्याने विदर्भातील संत्री उत्पादक आणि निर्यातदार हवालदिल झाले आहेत. बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्क कमी करावे, यासाठी केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी चर्चा करावी, अशी मागणी केली जात आहे. बांगलादेशच्या …
Read More »खळबळ : तहसीलदार, उपजिल्हाधिकारी वाळू व्यावसायिकांकडून घेतात हप्ते ! आमदारांचा आरोप
अवैध वाळू उपसा करणारे वाळू माफिया तहसीलदार, प्रांत अधिकारी, पोलिसांना हप्ते देतात. दादागिरी करतात, कुणालाही जुमानत नाहीत. राजकीय संरक्षण असल्याशिवाय वाळू माफिया तयार होत नाहीत. माफियांवर करवाई केली तर वरुन फोन येतात, असा आरोप जळगाव जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी केला. अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडल्यास आमदारांनी अधिकाऱ्यांना फोन करु नयेत, असा सल्ला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. जिल्हा नियोजन …
Read More »चालू बील भरलेल्या कृषीपंपाच्या वीजजोडण्या कापू नका-फडणवीसांचे निर्देश
काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्यादृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने एक निर्णय घेतलाय. ज्या शेतकर्यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहे अशा शेतकर्यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे बळीराजाला तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महावितरणकडून वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचे कनेक्शन कापले जात आहे. या कारवाईमुळे शेतकरी …
Read More »झाडांची बेकायदा कत्तल : तीन अधिकारी निलंबित
झाडांची बेकायदा कत्तल केल्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. संजीव प्रल्हाद राक्षे, मच्छिंद्र नामदेव कडाळे, भरत रामभाऊ पारखी अशी या तिघांची नावे आहेत. त्यांनी परवानगीशिवाय झाडांची कत्तल केल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता निगडीतील सावरकर उद्यान; तसेच चिंचवडच्या दत्तनगर …
Read More »सातारा : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची तीन पिल्ले
सातारा जिल्ह्यातील कराड गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या बाजूस उसाच्या शेतात ऊस तोडणी कामगारांना बिबट्याची तीन पिल्ले दिसली. काय झाले नेमके? सोमवारी दोन वाजण्याच्या सुमारास ही पिल्ले कामगारांना दिसली. शेतकरी प्रशांत तुकाराम यादव यांच्या शेतात बिबट्याची पिल्ले आढळली.स्थानिकांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. काही वेळातच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने वनवासमाची परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वनअधिकाऱ्यांनी …
Read More »झोक्यात मान अडकून मुलाचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातल्या मुंदडानगर भागातील एका १५ वर्षाच्या मुलाचा झोका घेत असताना गळ्याला गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटना कशी घडली? शहरातील वेदांत संदीप पाटील (१५) हा विद्यार्थी त्याच्या घरी झोका खेळत अभ्यास करत होता. यावेळी झोका गरगर फिरून त्याची मान त्यात अडकली. त्यामुळे त्याचा करूण अंत झाला आहे. वेदांत इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असल्याची प्राथमिक माहिती …
Read More »
विश्वभारत News Website