Breaking News

राज्य

नारायण राणेंनी घातली शिवसेनेच्या महिला नेत्याशी हुज्जत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाषण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उठून सभागृहातून बाहेर पडले. राणेंनी त्यांना अडवलं, त्याचवेळी भुजबळांनी त्यांना हात दाखवला. यावर राणे म्हणाले की, भुजबळांचं मला समर्थन आहे, म्हणूनच त्यांनी हात दाखवला. नारायण राणेंच्या औचित्यभंग करणाऱ्या भाषणामुळे टीकेचा सूर उमटत असताना ठाकरे शिवसेना गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा सभापती नार्वेकर यांना भाषण थांबवायला सांगितले. यावर …

Read More »

महाराष्ट्रायीन बिर्याणीचा जगातील उद्योजक घेणार आस्वाद

मुख्यमंत्री शिंदे देणार भेट महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडूचे पॅव्हेलियन्स आहेत. तसेच टीसीएल, विप्रो, एचसीएल या कंपन्यांचेही कक्ष आहेत. या पाच दिवसांच्या परिषदेत भारताचे 100 हून अधिक उद्योजक, चार केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काही राज्यांचे मंत्री आणि नेते उपस्थित असतील 👉स्विझरलँड येथील दावोस येथे पाच दिवसीय जागतिक आर्थिक परिषदेला प्रारंभ होत आहे. दावोसमध्ये विविध देशांची पॅव्हेलियन्स सजली असून, भारतीय पॅव्हेलियनमध्ये …

Read More »

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन

राज्यातील समुदाय आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे 10 हजार आरोग्य अधिकाऱ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. विविध जिल्ह्यातही आरोग्य अधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंदचा इशारा संघटनेने दिलाय. सोबतच बंधपात्रित अधिपरिचारिका यांनीही मागण्याकडे लक्ष वेधले होते. आंदोलन का? गेल्या सहा वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी उत्तमरित्या सेवा प्रदान करीत आहेत. …

Read More »

महाराष्ट्रातील प्रवासी? विमान दुर्घटनेत 5 भारतीयांसह 72 जणांचा अंत

नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक 72 प्रवासी घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झाले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 68 प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-72 हे प्रवासी विमान 72 जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.महाराष्ट्रातील कोणी प्रवासी आहेत का? याचा शोध …

Read More »

समृद्धी महामार्गावर वाघाचे दर्शन : चंद्रपूर ते नाशिक मार्गे मुंबई प्रवास

चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्तीत अग्रेसर आहे. त्यातच आता हा जिल्हा वाघांचे माहेरघर बनला आहे. मानवासह पशुधनावर वाघांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. नवीन वर्षात चंद्रपूर वनविभागाने दोन वाघ जेरबंद केले होते. त्यात एका नर, तर एका मादीचा समावेश आहे. बुधवारी, सायंकाळी नागपूर येथून या वाघांच्या जोडीची स्वारी समृध्दी महामार्गाने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने निघाली होती. गुरुवारी पहाटे …

Read More »

धक्कादायक : खराब हवामानामुळे महाराष्ट्रात १९४ जणांचा मृत्यू

देशात खराब हवामानामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.बिहारपाठोपाठ आसाम, उत्तर प्रदेशसह आणि महाराष्ट्र असा क्रमांक आहे. २०२२ मध्ये हवामानाच्या आक्राळ-विक्राळ रुपात सापडल्याने देशातील २ हजार २२७ लोकांचा मृत्यू झाला. केंद्राने यासंदर्भात राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनूसार, बिहारमध्ये खराब हवामानामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. बिहारपाठोपाठ महाराष्ट्र आणि ओडिशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आली.गतवर्षी वादळ-वारे तसेच …

Read More »

परस्पर विकली 400 एकर जमीन

कोल्हापुरातील दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीनी परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणाची चौकशी देवस्थान समितीने सुरू केली. मात्र तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांच्या पुढाकारानेच हे सगळे प्रकार घडले आहे,असा आरोप करीत याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते आणि देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबाची जमीन परस्पर …

Read More »

थंडीने होणार नववर्षाचे स्वागत : गारठा वाढेल

राज्यात कोकण वगळता इतरत्र गारठा वाढलाय. डिसेंबरअखेरीस असणारी थंडी यंदा मात्र जाणवत नसल्याचे दिसत आहे. सरासरीपेक्षा किमान तापमान २ ते ३ अंशांनी अधिक आहे. मात्र जानेवारीच्या सुरुवातीला पुन्हा एकदा थंडी वाढू शकते,असे अनुमान आहे. या काळात खूप तीव्र थंडी नसेल. सध्याच्या तुलनेत तापमानात घसरण होऊन थंडीची पुन्हा एकदा जाणीव होऊ शकेल. उत्तर भारतातील पश्चिमी प्रकोपामुळे २३ ते २७ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात …

Read More »

कोट्यवधींचा गौण खनिज घोटाळा

सांगलीतील तासगाव तालुक्यात दगड खाण पट्ट्यामधून हजारो ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे. स्टोन क्रशरच्या मालकांनी परवान्यापेक्षाही कित्येक पट जास्त गौण खनिजाचे अवैध व बेकायदेशीर उत्खनन करून राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्याचा सपाटा लावला आहे. प्रशासन मात्र गांधाराची भूमिका घेऊन गप्प बसलेले आहे. यामुळे कुंपणच शेत खातयं की काय, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.तालुक्यात एकूण 12 …

Read More »

उद्धव ठाकरेंकडून दिशाभूल : हरपूर प्रकरणात शिंदेना बदनाम करण्याचा डाव, मोहन कारेमोरे यांचे फडणवीस यांना निवेदन

नागपूर सुधार प्रन्यासचे (नासुप्र) हरपूर येथील एकूण १६ भूखंड आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील व्यक्तींसाठी आरक्षित आहेत. तरीही ते गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना घेतला होता, असा दावा विरोधकांनी केला. मात्र,जनतेला निव्वळ भ्रमित करण्याचा प्रकार उद्धव ठाकरेकडून सुरु आहे. यासंदर्भात अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी 26 मे 2020 रोजी …

Read More »