विश्व भारत ऑनलाईन : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र अभयारण्यातील दिमाखदार तोऱ्यात वावरत असलेली व पर्यटकांना भुरळ घालणारी झुनाबाई ही वाघीण १७ बछड्यांची आई बनली आहे. नुकतेच तिने पाचव्यांदा तीन बछड्यांना जन्म दिला आहे. देशभरातून ताडोबात येणारे पर्यटक झुनाबाईची झलक पाहण्यासाठी आतूर असतात. तिच्या वारंवार होणाऱ्या दर्शनाने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा शुध्दा तिचा …
Read More »अजगराची हत्या,वनविभाग सक्रिय
विश्व भारत ऑनलाईन : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात एका अजगराची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वनविभागाने गुन्हा दाखल करत संशयिताची चौकशी सुरु केलीय. तालुक्यातील मलंगगड परिसरात उसाटणे गाव आहे. या गावातील खोणी तळोजा महामार्गाच्या बाजूला आज सकाळी काही फोटो स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले. अजगराचं डोकं ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी …
Read More »हृदय श्वसनक्रिया बंद पडल्याने 4 वर्षीय वाघिणीचा मृत्यू
विश्व भारत ऑनलाईन : हृदयक्रिया बंद पडल्यानेच वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणा परिक्षेत्रात घडल्याची माहिती समोर आली आहे.वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे वन विभाग चिंतेत असतानाच परत एका वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे नागपूर जिल्ह्यात वाघांची शिकार वा मृत्यूच्या घटना नव्या नाहीत. यापूर्वी २३ मार्च २०२१ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागवाडी परिक्षेत्राच्या शेजारील एफडीसीएमच्या रिसाला परिक्षेत्रात एक वाघ कुजलेल्या स्थितीत आढळून …
Read More »नागपूरजवळ वाघाचा मृत्यू
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील हिंगण्याजवळ सातनवरी भागात वाघाचे शव मिळाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच हिंगणा वनविभागाची टीम घटनास्थळी पोचली. नैसर्गिक मृत्यू असल्याची माहिती आहे. ही घटना महसूलच्या जागेत असल्याचे कळते. याबाबत वनविभागाने तपास सुरु केलाय. मात्र, संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही.
Read More »शेफी नावाच्या कुत्र्यालाही फटाके, रोशनाईचा मोह आवरेना… व्हिडीओ एकदा बघाच
विश्व भारत ऑनलाईन : फटाके आणि दिवाळी हे समीकरण दोन शतकहुन अधिक काळापासून पाहायला मिळते. दिवाळीत एक तरी फटका फोडावा, असं प्रत्येकाला वाटते. तर, आकाशात होणारी आताषबाजी असो किंवा रोशनाई पाहण्याची आवड कुणालाही थांबविता येत नाही. असाच मोह एका मुक्या प्राण्याला अर्थात श्वानालाही (शेफी नावाचा कुत्रा) आवरता आला नाही… खालील लिंकवर आकाशातील रोशनाई पाहण्यासाठी आतूर झालेल्या कुत्र्याचा व्हिडीओ नक्की बघाच… …
Read More »वाघाने काढला जंगलातून पळ
विश्व भारत ऑनलाईन : जंगलाचा राजा वाघ. वाघ म्हटलं की, अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकते. जंगलातील प्राणीही वाघ दिसला की सैरभैर पळतात. मात्र, वाघाला पळवून लावले… पण कोणी… बघा व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करा… https://twitter.com/santoshsaagr/status/1579791956083101696?t=sZUUpdJ1-zD7OK5v-WOWTA&s=19
Read More »यंदा रेनकोट घालून फटाके फोडायचे की, पाऊस माघार घेणार? वाचा…
विश्व भारत ऑनलाईन : यंदा पाऊस माघारी जाण्यास विलंब लावतोय. रेनकोट घालून तर दिवाळीत फटाके फोडावे लागणार नाही ना, अशी चर्चा आहे.तर दुसरीकडे नैऋत्य मोसमी वारे राज्यातून माघार घेत असल्याने विविध जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. सध्या परतीचा पाऊस वेगाने माघारी सरकत असून २० ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्याबाहेर जाण्याची शक्यता दिसते.त्यामुळे दिवाळीत ढगाळ वातावरण राहू शकते. मात्र, पावसाची …
Read More »मान्सून २४ पर्यंत! विदर्भातून माघार, मराठवाड्यात येलो अलर्ट
विश्व भारत ऑनलाईन : उत्तर महाराष्ट्र व विदर्भातून मान्सून माघारी गेला. मात्र, तरीही कोकण व मध्य महाराष्ट्रात त्याचा मुक्काम 24 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूरसह एकूण नऊ जिल्ह्यांत 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास रविवारी उत्तर भारतातील बिलासपूर, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, प. बंगाल या राज्यांतून झाला. महाराष्ट्रात विदर्भातून तो रविवारी परतीला निघाला. …
Read More »थंडी आणि पाऊस राज्यात एकाचवेळी : डिसेंबरपर्यंत पाऊस
विश्व भारत ऑनलाईन : हिंद महागारातील पृष्ठभागाच्या तापमानाचा परिणाम देशाच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत थंडी आणि पाऊस असेल.या कालावधीत हिमालयात पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे. देशातील बहुतांश भागात पाऊस तसेच कडाक्याची थंडी, असे वातावरण असू शकते. उत्तर भारतातून पश्चिमी चक्रवात तर दक्षिण भारतामधून कमी दाबाचे पट्टे असे वातावरण राहणार असल्याने महाराष्ट्रातही थंडी व पाऊस राहण्याची …
Read More »गोंदियातील हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने
विश्व भारत ऑनलाईन : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागणडोह येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला. परिणामी,वस्तीतील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पश्चिम बंगाल येथून आलेले सहा जणांचे हत्ती नियंत्रक पथक आणि वन विभागाची रेस्क्यू टीम याच परिसरात शुकवारी सकाळपासूनच तळ ठोकून आहे. नागणडोह येथील घटनस्थळी सहायक उवनसंरक्षक दादा राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही़ पी. तेलंग, वनक्षेत्र सहायक एफ.सी. …
Read More »
विश्वभारत News Website