वर्धा: वर्धा व अमरावती जिल्हयात सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारची मदत जाहीर न केल्याने शेतकरी पुर्णपणे उध्वस्त होण्याच्या स्थितीत आहे. वर्धा व अमरावती जिल्हयात सोयाबीनवर आलेल्या प्रादुर्भावामुळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तातडीने सर्वेक्षण करुन शासनाने शेतक-यांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार रामदासजी तडस यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली, या सोबतच पिकविम्याची रक्कम मिळण्याकरिता जिल्हाधिकारी वर्धा व अमरावती यांनी कालबध्द वेळेत कार्यवाही करावी अश्या सुचना यावेळी दिल्या.
आधि कोरोना, सोयाबीन पिकांवर रोग व आता अतीवृष्टी अश्या तिहेरी संकटात वर्घा व अमरावती जिल्हयातील शेतकरी सापडलेला आहे. . सोयाबीनवर अज्ञात रोग आल्याने शेतकर-यांच्या हातची पिकं गेली असून त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. तसेच आता अतिवृष्टीमुळे संपुर्ण सोयाबीनचे नुकसान झाले आहे, वर्धा जिल्हयातील सर्व तालुक्यातील सोयाबीन उत्पादन शेतक-यांच्या शेतात जावून सर्वेक्षण करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभ मिळण्याकरिता सर्व शेतक-यांना सहकार्य करावे असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.