औरंगाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. औरंगाबादमध्ये एका बड्या सरकारी अधिकाऱ्याला तब्बल साडेआठ लाखांची लाच घेतना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश देशमुख असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद येथे जलसंधारण विभागात आठ लाख 53 हजारची लाच घेताना देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. देशमुख हे वैजापूर जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून …
Read More »चंद्रपूर : ब्रम्हपुरीत भीषण अपघात, 31 जखमी
लग्नाचे वरात घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील टिळक नगर जवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो वाहन पलटून वाहनात बसलेले 31 जण जखमी झाले असून यात आठ जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे नातेवाईकांकडे नामकरण विधीचा कार्यक्रम असल्याने रणमोचन येथील दोनाडकर व आप्त परिवार हे मालवाहक टेम्पो वाहनाने …
Read More »बाळासाहेब थोरात काँग्रेस सोडणार?नाना पटोलेंची मनमानी
✍️मोहन कारेमोरे : नाशिक पदवीधरमधून सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून सुरु झालेला वाद अजूनही संपलेला नाही. यावर काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात कधी बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्यावर आता थोरात बोलले असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे मत हायकमांडला कळविले आहे.नाना पटोले यांची मनमानी थांबवा, अशा आशयाचे पत्र आहे.पक्षश्रेष्टी नाना पटोलेचा मनमानी कारभार कसा …
Read More »विनंती बदल्या रखडल्याने तहसीलदार,पोलिसांमध्ये नाराजी
पदोन्नतीसाठी पात्र असतानाही पदोन्नत्या होत नसल्यामुळे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये ‘खदखद’ दिसते. पोलीस महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात ताळमेळ नसल्याचा फटका पोलीस अधिकाऱ्यांना सोसावा लागत असल्याची भावना अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या बदल्या अजूनही झालेल्या नाहीत. एक निवडणूक झाली की दुसरी डोके वर काढून तयार आहे. त्यामुळे सरकार मार्चनंतर बदल्या करणार की आता?असा प्रश्न सतावत आहे. …
Read More »दिग्गज क्रिकेटरची पत्नीला बॅटने मारहाण
भारतीय क्रिकेटचा माजी खेळाडू विनोद कांबळी अडचणीत सापडला आहे. त्याच्या पत्नीने शुक्रवारी त्याच्याविरोधात मद्यधुंद स्थितीत मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कांबळीविरोधात भादंवि कलम 324 व 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डोक्याला दुखापत विनोद कांबळीने आपल्याला स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल फेकून तिच्या डोक्याला दुखापत केल्याचा आरोप अँड्रिया कांबळीने केला आहे. त्याचवेळी हे प्रकरण सोडवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा ‘राजकीय गेम’ : काँग्रेसमध्येच षडयंत्र
✍️मोहन कारेमोरे : नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसने एबी फॉर्म दिलेला असतानाही पक्षाला टाळून अपक्ष अर्ज सत्यजित तांबे यांनी दाखल केला होता. तांबे यांची कृती राज्यात काँग्रेसचा धाक संपुष्टात आल्याचे लक्षण असून यासंदर्भात त्यांचे मामा ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बाळगलेले कडकडीत मौन म्हणजे तांबे पिता-पुत्रांच्या भूमिकेला अप्रत्यक्षरीत्या दिलेले समर्थनच मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर विजयाची …
Read More »राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय वाढवा-खासदाराची मागणी
बऱ्याच वर्षांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्याचा मुद्दा चर्चेत आहे. आधी राज्य सरकारने जुनी पेन्शन आणि आता सेवानिवृत्त वयोमर्यादा वाढविण्याची मागणी चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बंडू धानोरकर यांनी केली आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करण्यात यावी, अशी मागणी खासदार धानोरकर यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मागणीकडे किती लक्ष देतात, याकडे …
Read More »नाना पटोलेंवर सत्यजित तांबेंचा गंभीर आरोप
✍️मोहन कारेमोरे : नाशिक पदवीधर निवडणुकीतून विजय झालेले सत्यजित तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला जाणीवपूर्वक अडचणीत आणून काँग्रेसने काय साध्य केलं, असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला. नाना पटोले यांनी तर माझा फोनही उचलला नाही. माझ्या विरोधात खोटा प्रचार केला, असा आरोप तांबे यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस सोडणार का? सत्यजित …
Read More »नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. चोरटे या प्रयत्नात अयशस्वी ठरले अन् पोलिसांनी त्यांना गजाआड केले. ही घटना शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ परिसरात घडली. न्यायमूर्ती व वकिलांची वाहने या परिसरात पार्क करण्यात येतात. त्यामुळे नागपूर खंडपीठाचा परिसर बराच मोठा …
Read More »पोहे खाणाऱ्यांनो काळजी घ्या…मोठे नुकसान
पोषणतज्ञच्या माहितीनुसार, अनेक नाश्त्याच्या अनेक पर्यायांपेक्षा पोहे पौष्टिक मानले जातात. पण त्यामध्ये कार्बोहायड्रेटच्या प्रमाणामुळे तुमचे वजन वाढवू शकते. ✳️रोज पोहे खाल्ल्याने वजन वाढण्यासोबतच लठ्ठपणाची समस्याही निर्माण होऊ शकते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. याशिवाय शेंगदाणे, बटाटे यांचाही वापर पोहे बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे या पदार्थांमुळे शरीरातील चरबी आणि लठ्ठपणा वाढू शकतो. ✳️पोहे साधारणपणे पांढऱ्या तांदळापासून …
Read More »
विश्वभारत News Website