Breaking News

विश्व भारत

नागपुरात केंद्रीय मंत्र्याच्या नावे कोटींची मागितली खंडणी : चौघांना अटक

नागपुरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी थेट केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर तब्बल १ कोटी खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास बदनाम करण्याची धमकी दिली. प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील तीन तोतया पत्रकारांसह चौघांना अटक केली आहे. पीयूष पुरोहित, राष्ट्रभान पोर्टलचा पत्रकार संजय बघेल, संजीत बघेल आणि वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीचे आदेश …

Read More »

शिवसेना नेत्याने वन कर्मचाऱ्याकडून घेतले बदलीसाठी दोन लाख

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात बदली करुन देण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषीकेश खैरे यांनी पैसे घेतले. यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये समोरची व्यक्ती काम न झाल्याने ऋषीकेश खैरे यांना बदलीसाठी दिलेले 2 लाख रुपये परत मागत आहे. ऋषीकेश खैरे यांनीही हा व्यवहार झाल्याचे मान्य केले. तर संबंधिताचे पैसे परत देण्यात येतील असे म्हटले आहे. वन …

Read More »

नागपुरातील भूमी अभिलेख विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा : शेतकऱ्यांना अधिकारी देतात त्रास

नागपुरातील भूमी अभिलेख विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. या कार्यालयाने एका सत्तर वर्षीय वृद्धाला जिवंत असताना मृत्यू दाखल्याची मागणी केल्याचे प्रकरण ‘विश्व भारत’ने लावून धरले होते. या विभागाकडे शेतकरी मोठ्या आशेने बघतोय. शेत मोजणी करण्यासाठी अनेक अर्ज कार्यालयात येतात. पण, नागरिकांना नाहक त्रास देऊन प्राप्त अर्ज निकाली न काढण्याची किमया या विभागातील अधिकारी-कर्मचारी करतात. अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर …

Read More »

गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर गायींची अवैध विक्री : शिंदे लक्ष देणार काय?विखे पाटील ‘महसूल’मध्ये रमले

✍️मोहन कारेमोरे : संपादक✍️ गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील पेंढरी रस्ता आणि छत्तीसगडच्या सीमेवरील बठेहार या गावातून गायींची बेकायदेशीर खरेदी-विक्री केली जात आहे. याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लक्ष देतील काय, असा प्रश्न आहे. विखे पाटील यांच्याकडे महसूल खात्याचा पदभार आहे. तर, पशुसंवर्धन खात्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे. मात्र, महसूल कडे अधिक लक्ष तर पशुसंवर्धनकडे दुर्लक्ष …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांची बदली : कर्मचाऱ्यांना मागितले पैसे

कर्मचाऱ्यांकडून 1 हजार रुपयांची वर्गणी जमा करण्याचा वादग्रस्त आदेश देणाऱ्या दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आश्विन चंद्रू ए. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून 1 हजार रुपये देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. गोवा सरकारमधील अव्वर सचिव एहांत सावंत यांनी राज्यपालांच्यावतीने हा आदेश जारी केला आहे. ज्योती कुमारी …

Read More »

पत्रकारितेमधील बारकावे आत्मसात करा : गडचिरोलीत डिजिटल मीडिया कार्यशाळा

डिजिटल मीडियासाठी बातमीचे लिखाण कसे केले जाते, एसईओ म्हणजे नक्की काय, डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली जाते, ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र, बातम्यांचे की-वर्ड आदी महत्वाच्या विषयांवर डिजिटल मीडिया अभ्यासक व पत्रकार देवनाथ गंडाटे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावर असलेल्या संविधान सभागृहात शहरातील माध्यम प्रतिनिधीसाठी डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी बदलते माध्यम, मोबाईलमुळे झालेले बदल, …

Read More »

नागपुरच्या भूमी अभिलेख कार्यालयाचा पैशासाठी सामान्यांना त्रास : पवार, प्रयागीला निलंबित करा

नागपुरच्या भूमी अभिलेख कार्यालयाने एका सत्तर वर्षीय वृद्धाला जिवंत असताना मृत्यू दाखल्याची मागणी केलीय. प्रकरण असे की, उत्तमराव खराबे नागपुरातील ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत होते. त्यांना त्यांच्या जमिनीविषयी मोजमाप करून घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी नागपूर तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालय गाठले. यासाठी भूमी अभिलेख अधिकारी पवार व प्रयागी यांनी त्यांना मृत्यू दाखला घेऊन येण्याचे सांगितले. काही काळ आपल्यासोबत काय होत …

Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचे आर्थिक शोषण

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नगरपालिका प्रशासनाकडून आकारण्यात येणारी विविध शुल्क वसुली थांबवावी, अशी मागणी होत आहे. ही वसुली तात्काळ थांबवून नियमानुसार लाभार्थ्यांना योजनेचे हप्ते वाटप करावेत, अशी मागणी समोर येत आहे.परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना याबाबतचे बुधवारी काही जणांनी निवेदन दिले. काय आहे निवेदनात? मानवत नगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कार्यालयीन, विकास व प्रशासन शुल्क आणि मालमत्ता कर असे …

Read More »

सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अजिठा, अनाड गावासह परिसरात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा, पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. काढणीला आलेला गहू अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे पूर्णतः जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून …

Read More »

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना तहसिलदारांचा दणका

भाजपचे नेहमी चर्चेत असलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांना मिरज तहसीलदार दगडू कुंभार यांनी चांगलाच दणका दिला आहे. मिरजमधील वादग्रस्त जागेवर संबंधित मिळकतदारांचा हक्क देण्याचा आदेश तहसिलदारांनी मान्य केला आहे. तसेच ब्रम्हानंद पडळकर यांना या निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याचीही मुभा दिली आहे. प्रकरण काय? 7 जानेवारीला मध्यरात्री मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील …

Read More »