अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे परिसरात खडके वस्तीवरील ६५ वर्षीय महिलेला बिबट्याने १०० फूट फरफटत नेऊन फडशा पाडल्याची घटना घडली.तालुक्यात बिबट्याने दुसरा बळी घेतला असून नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. घटना कशी घडली? खडके वस्तीवर रखमाबाई तुकाराम खडके ( वय ६५ वर्षे) या राहत असुन काल रात्री त्या सपराच्या घरात झोपल्या होत्या. मध्यरात्रीनंतर बिबट्याने घरात प्रवेश करुन त्यांच्यावर हल्ला केला. …
Read More »नाशिक : सागवनाची कत्तल
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील चिखली गावाजवळ वनविभागाने सव्वा लाख किमतीचे सागवान लाकूड जप्त केले. चिखली गावानजीक वनविभागाच्या कंपार्टमेंटमध्ये मौल्यवान सागाच्या झाडांची कत्तल करुन ते गुजरात राज्यात विक्री करण्याची तयारी असल्याचे कळते.तसेच यासंदर्भात वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभाग प्रादेशिकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार दि.(२३) रोजी मध्यरात्री सापळा रचला. सव्वा लाखाचा माल जप्त सागवान झाडांची कत्तल करुन ठेवलेले …
Read More »पंतप्रधान मोदी जानेवारीत येणार नागपूरला
भारतीय विज्ञान परिषदेचे दहावे आयोजन नागपुरात होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमान पदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होईल. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 1914 मध्ये भारतात विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोलकाता येथे पहिल्या भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी हे आयोजन भारतातील …
Read More »ग्रामसेवक, सरपंचाला कार्यालयात कोंडले : प्रकरण अवैध धंद्याचं
चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथे ग्रामस्थांसह महिलांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. अनेक दिवसांपासून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करूनही कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा संपल्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांना कोंडून कार्यालयाला कुलूप ठोकले. जामदात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनकडून होत आहे. गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करीत होते. …
Read More »५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित : सरपंचपदाचे आरक्षण चुकले
सरपंच पदाच्या आरक्षणपदाची प्रक्रिया चुकीची केल्याने भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील तब्बल ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. चौकशी करुन दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रकरण काय? राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणूक कार्यक्रमान्वये मोहाडी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींपैकी ५८ ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदाच्या निवडणुका जाहीर …
Read More »खळबळ : तहसीलदार, उपजिल्हाधिकारी वाळू व्यावसायिकांकडून घेतात हप्ते ! आमदारांचा आरोप
अवैध वाळू उपसा करणारे वाळू माफिया तहसीलदार, प्रांत अधिकारी, पोलिसांना हप्ते देतात. दादागिरी करतात, कुणालाही जुमानत नाहीत. राजकीय संरक्षण असल्याशिवाय वाळू माफिया तयार होत नाहीत. माफियांवर करवाई केली तर वरुन फोन येतात, असा आरोप जळगाव जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी केला. अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडल्यास आमदारांनी अधिकाऱ्यांना फोन करु नयेत, असा सल्ला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. जिल्हा नियोजन …
Read More »चालू बील भरलेल्या कृषीपंपाच्या वीजजोडण्या कापू नका-फडणवीसांचे निर्देश
काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्यादृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने एक निर्णय घेतलाय. ज्या शेतकर्यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहे अशा शेतकर्यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे बळीराजाला तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महावितरणकडून वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचे कनेक्शन कापले जात आहे. या कारवाईमुळे शेतकरी …
Read More »मंत्र्याची मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हानी : तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी फिल्डिंग, आरोग्य सेवकांच्या नाकीनऊ
शिस्तबद्ध अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची धडकी आता आरोग्य सेवकांनाही भरली आहे. काम नीट करा, नाहीतर नोकरी सोडा.. असा इशारा देणारे आणि एकामागून एक आदेश देत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या तुकाराम मुंढेंनी आरोग्य सेवकांच्या नाकीनऊ आणलेत. तुकाराम मुंढे आरोग्य आयुक्त म्हणून रुजू होऊन महिना दोन महिनेही झाले नाहीत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरु झालेत. आरोग्य मंत्र्यांनी तुकाराम …
Read More »‘पीडब्लूडी’चा आधी नकार, आता होकार : नव्या उड्डाणपूलांबाबत प्रस्ताव
औरंगाबाद महामार्गवरील हॉटेल मिरची चौकात झालेल्या अपघातानंतर महापालिकेने उड्डाणपुलाची गरज व्यक्त केली होती. मात्र, आधी नकार दिल्यानंतर आता या विषयावर सार्वजनिक बांधकाम विभागाने यू-टर्न घेत स्वतःहून शासनाकडे तीन उड्डाणपूलांची आवश्यकता असल्याचे सांगत प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार शासनाने मंजुरी दिल्यास हॉटेल मिरची चौक, सिद्धिविनायक लॉन्स चौक व नांदूर नाका चौक यातील ठिकाणी औरंगाबाद महामार्गावर नाशकात उड्डाण पुल दिसेल. ऑक्टोबर महिन्यात …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे अधिकारी लक्ष देईना : पुराव्यासह आमदाराची तक्रार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र,मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे एक महिन्यापासून जिल्हा उपनिबंधकांनी आदेश डावलून प्रशासकाची नेमणूक केली नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हा उपनिबंधकांविरोधात पुराव्यासह सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता सहकार विभागाकडून जिल्हा उपनिबंधकावर काय कारवाई करण्यात …
Read More »