विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेत भाजप सत्तेपासून दूर आहे. ही परिस्थिती अकोला जिल्हा परिषदेत पाहायला मिळत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांच्या चुरसपुर्ण लढतीत वंचितने बाजी मारली. यात भाजपच्या दोन मतांच्या साथीने वंचितने चारही पदांवर झेंडा फडकवला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोल्यातील जिल्हा परिषदेत भाजपात फुट पडली आहे. आज भाजपच्या पाचपैकी तीन सदस्यांनी महाविकास आघाडीला …
Read More »खासदार राजेंद्र गावित अडचणीत ; १६ तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप
विश्व भारत ऑनलाईन : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राजेंद्र गावित चांगलेच अडचणीत सापडले आहेत. गावित यांनी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६ बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात मुंबईतील उद्योग क्रांती केंद्र या संस्थेचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यामुळे गावित यांच्यासह या संस्थेचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. आरोप फेटाळले खासदार गावित यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले …
Read More »राष्ट्रवादीनेच भाजपला सत्तेत आणले : काँग्रेस-राष्ट्रवादीत कलगीतुरा
विश्व भारत ऑनलाईन : २०१४ मध्ये राज्यात आघाडीचे सरकार होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादीमुळेच आल्याचा आरोप राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, २०१४ मध्ये …
Read More »लवकरच मंत्रिमंडळ विस्तार : नागपुरातून कुणाला संधी ? दटके, मेघे, खोपडे, मते, फुकेपैकी कोण होणार मंत्री?
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर शहर आणि जिल्ह्यांत 2014 मध्ये भाजपचे 11 आमदार निवडून आले होते. पाच वर्षांनंतर फक्त पाच आमदार निवडून आले. आता नागपुरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा नव्याने सुरू झालीय. ✳️यात नागपूरमधून शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांना लाॅटरी लागू शकते, अशी शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपद द्यायचे नसल्याने प्रदेशाध्यक्ष पद दिले. …
Read More »बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल : रवी राणांवरील टीका
विश्व भारत ऑनलाईन : बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद आता चिघळला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर अमरावती शहरातील राजापेठ ठाण्यात भारतीय दंडविधानातील कलम ५०१ अंतर्गत बच्चू कडू यांच्यावर अब्रूनुकसानीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांच्या विरोधात वक्तव्य …
Read More »नारायण राणे चारआण्याचा माणूस : कोणी केली टीका?
विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा चार आण्यावरील फोटो व्हायरल झाल्यानंतर आता यावर महत्वाच्या प्रतिक्रीया आल्या आहेत. राणेंची किंमत चार आण्याएवढीच आहे, असे टीकास्त्र शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. ”या फोटोबाबत माहित नाही पण ते आमचे मित्र त्यांचा फोटो असा चलनात आला तर वाईट काय आहे? ” अशी मिश्किल टीका छगन भुजबळ यांनी केली. …
Read More »शिंदे गटाचे आमदार नाराज, शेतकरी त्रस्त : कंत्राटदारांना मोबदला मिळेना, विकासकामे रेंगाळण्याची भीती
विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत आहेत. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत,” अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्री शिंदेंची दमछाक बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरु आहे. तरी, जळगाव जिल्ह्यात …
Read More »उद्धव ठाकरे फुसका फटाका
विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कुणाला कुठल्या फटाक्याची उपमा द्याल असे विचारले असता ते म्हणाले की, आमचे नेते नरेंद्र मोदी हे रॉकेट आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बॉम्ब आहेत. रॉकेट आणि बॉम्ब राज्यात कुणाकडेही नाही ते फक्त भाजपकडे आहेत. बाकी राज्यातल्या इतर पक्षांमध्ये लवंगी फटाके बरेच आहेत. खाकी फटाका कुणाला म्हणाल? या प्रश्नावर त्यांनी …
Read More »केंद्रीय मंत्री दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव शिंदेसेनेत? वाचा…
विश्व भारत ऑनलाईन : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसशी नाते सांगत होते. मग त्यांनी शिवसेना, मनसेची साथ घेतली.आता त्यांची शिंदेसेनेशी जवळीक वाढल्याचे दिसते.उद्योगमंत्री उदय सामंत यांना ते मुंबईत जाऊन भेटल्याने कन्नड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. त्यांचे समर्थक जाधव यांनी शिंदेसेनेत जावे, असे म्हणत असले तरी भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि जाधव यांच्यामधील द्वेष लक्षात घेता असा …
Read More »शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, चर्चांना उधाण
विश्व भारत ऑनलाईन : राजकारणात काहीही शक्य आहे. एकमेकांचे वैरी कधी एकत्र येतील, याचा नेम नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांपैकी 22 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील प्रसिद्ध सदर ‘रोखठोक’मधून हा दावा केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना …
Read More »
विश्वभारत News Website